प्रस्तावना

दुर्दैवाने शिवाजी महाराजां विषयी अधिकृत व चांगले चरित्र उपलब्ध नाही. औरंगजेब त्या मानाने सुदैवी निघाला. कारण यदुनाथ सरकारांच्यासारखा लेखक त्याला उपलब्ध झाला. शिवाजीला अजून योग आलेला नाही व नजीकच्या भविष्यकाळात येण्याची शक्यताही नाही. दत्तोपंत पोतदार ‘प्रमाणित’ चरित्र लिहू शकणार नाहीत, असे वाटते. युरोपीय इतिहासकार व बंगाली इतिहासकार सेन, सरकार यांच्यासारख्या थोर व्यक्तींना मराठी कागदपत्रांतील बारकावे माहीत नसतात व महाराष्ट्रीय संशोधकांना अजूनही निर्विकारपणेपण शेजवलकर, शर्मा, कुलकर्णी, डॉ. बाळकृष्ण, वैद्य यांनाही अभिनिवेश टाळता येत नाही. त्या मानाने दत्तोपंत आपटे यांनी फार शिस्तशीर काम चालविले होते. घटनांच्यापुरते बोलायचे झाले, तर हे कार्य माझ्या पाहण्यात आलेल्या पुस्तकांत श्री. दि. वि. काळे यांनी जास्तीत जास्त चोखपणाने केले आहे.


शिवाजीच्या चरित्रविषयक साधनांत रामदासी पंथाच्या बखरी या सर्वांत जास्त अविश्वसनीय आहेत. मेरुस्वामी व दिनकर हे दोनच शिष्य असे आहेत की, जे समर्थ वारले, त्या वेळी वयाने प्रौढ होते. इतर सर्वांचे ज्ञान ऐकीव व विपर्यस्त आहे. त्यापेक्षा मराठेशाहीच्या बखरी अधिक विश्वसनीय आहेत. पण त्यांतही सर्वांत अविश्वसनीय मल्हार रामराव चिटणीसाची बखर व सर्वांत विश्वसनीय सभासदाची बखर आहे. दुर्दैवाने वस्तुस्थिती अशी आहे की, शिवाजीच्या संदर्भात फारसी साधने सुद्धा, अस्सल कागदपत्र वजा जाता, विश्वसनीय नाहीत. यापेक्षा विश्वसनीय पोर्तुगीज, फ्रेंच व डच रेकॉर्ड आहेत;

आणि मराठी अस्सल कागदपत्र सर्वश्रेष्ठ साधने आहेत. आपण कोणत्याही घटनेबाबत स्वत:चे मत निश्चित करताना विश्वसनीयतेचा हा क्रम ध्यानात असू द्यावा व बखरकारांत सर्वांत विश्वसनीय म्हणजे सभासद. तोही फार ढोबळ चुका करतो, ही बाब समजून घ्यावी. आपणांशी बोलताना चिटणिशी बखरीचा परिणाम सतत जाणवत होता. अविश्वसनीयतेत ह्या बखरीचा क्रम फार खाली आहे.

कादंबरी-लेखनाचा आधार वास्तवाचे अवलोकन व आकलन हा असतो, अशी माझी धारणा आहे. हे आकलन व अवलोकन कलाकृती बनताना सलग, एकजीव अनुभवांचा आकार धारण करते. सामाजिक कादंबरीत आकलन-अवलोकनाची कक्षा वर्तमान वास्तव आहे. ऐतिहासिक कादंबरीत तिचे स्वरूप ऐतिहासिक वास्तव हे आहे. ऐतिहासिक वास्तव फुटकळपणे उपलब्ध होते. त्यातील रिकाम्या जागा भरणे, हे सारे वास्तव समूर्त साकार करणे, इतकेच खच्या ऐतिहासिक कादंबरीत कल्पिताचे स्थान असू शकते. कल्पिताचा

पारा ही सीमा ओलांड लागला. म्हणजे मग त्या वाङमयाचे स्वरूप रंजनात्मक होते. हे काम नाथमाधवांनी या पूर्वी करून ठेवले आहेच. हरिभाऊंनी सगळा शिवाजी घेतला नाही. पण उष:काल, सूर्योदय, गड आला पण सिंह गेला, मध्ये काही टप्पे घेतलेले आहेत. नाथमाधव आणि हरिभाऊ यांत हरिभाऊ चांगले, पण दोघांतील फरक प्रमाणाचा आहे, प्रकाराचा नव्हे. याच रांगेत आपणांस उभे राहायचे आहे, की स्वामीच्या रांगेत उभे राहायचेआहे, याचा निर्णय आपण स्वतः घेतला पाहिजे. शेवटी कलाकृती उभी राहते सामर्थ्यवान व्यक्तिरेखेवर. व्यक्तिरेखेचे हे सामर्थ्य वास्तवाच्या आकलनातून येईल. आदर, श्रद्धा या बाबी तिथे अपुग्या पडतात. वरील ‘उपदेश' मी करणार नव्हतो. आपण सहज बोलताना म्हणालात ‘मी इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका, सारेच घेणार आहे, म्हणून वरील सल्ला अनाहूत दिला आहे. छत्रपतींचा ‘अवतार' अगर ‘संत’ करण्यापेक्षा त्यातले भव्य आणि सलग माणूसपण रंगविणे मला महत्त्वाचे वाटते.

याबाबत काही घटनांचा प्रथम निर्देश केला पाहिजे. पहिली घटना म्हणेज मालोजीचा व बाबाजी भोसले ह्यांचा उल्लेख कागदपत्रांतून पांडे पेडगावचा जागिरदार म्हणूनच येतो. मालोजीला मिळालेल्या जागिरीपैकी निदान काही भाग त्याला वारसाहक्काने मिळालेला

आहे. शहाजी इ.स. १६०२ मध्ये जन्मला. १६०७ ला मालोजी वारले. त्या वेळी शहाजी पाच वर्षांचे होते. शहाजीच्या लहानपणी मालोजी लखुजीराव जाधवाच्या पदरी बारगीर होता. ही, रंगपंचमीच्या रंगाची व डुकरे मारून मशिदीत टाकण्याची या सर्व बखरकारांच्या हकीकती अस्सल पुराव्याच्या विरोधी जाणाच्या, म्हणून रद्द आहेत.

जिजाबाईस एकूण सहा अपत्ये झाली. त्यांत संभाजी पहिला. शिवाजी दुसरा. असे दोन मुलगे वाचले. शहाजीचे जिजाबाईवर फार प्रेम नव्हते, असे दिसते. पण तिला, बेताचे का होईना, संसारसुख शहाजीने दिले आहे.

स्वतः शिवाजीमहाराजांनीही आपले संसार असेच केले आहेत. कोणतीच बायको त्यांची लाडकी दिसत नाही. लग्न करावे, पोटभर अन्न, भरजरी कपडे, अलंकार, सोयीनुसार अंगभोग यांपलीकडे शिवाजीने कुठल्याच राणीला महत्त्व दिले नाही. सोयराबाई ही अभिषिक्त पट्टराणी; पण तिलाही शिवाजीच्या मनात फारसे महत्त्व दिसत नाही. शिवाजीमहाराजांना एकूण बायका आठ. उपस्त्रिया असल्याचा उल्लेख रामदासी बखरीतआहे. त्याला महत्त्व देण्याचे कारण नाही. या पत्नींच्यापैकी अगदी शेवटचे विवाह १६५७ चे आहेत. शिवाजीच्यानंतर सती गेलेली पुतळाबाई हिचा शिवाजीशी विवाह १६५३ साली झाला, असे इतिहासकार मानतात. राज्याभिषेकाच्या वेळी या आठपैकी चार वारलेल्या होत्या. या मृत पत्नींत सगुणाबाई, सईबाई, काशीबाई, या तीन नक्की मृत . चौथी कोण मृत होती, हे नक्की नाही. सोयराबाई, पुतळाबाई नक्की हयात होत्या. राज्याभिषेकापूर्वी शिवाजीची मुंज लावण्यात आली. त्यानंतर पूर्वीच्याच पत्नींपैकी हयात असणाच्या चौघींशी वैदिक विधिपूर्वक लग्ने लावण्यात आली. या घटनेने अनेकांचा गोंधळ उडालेला आहे.

काही बखरींनी ‘राज्याभिषेक प्रसंगी लग्न' या ऐकीव बातमीवर पुढील इमला रचला आहे. इंग्रज व डच यांच्या रिपोर्ट्समध्ये याचमुळे गोंधळ आहे. नेमक्या ह्याच ठिकाणी जदुनाथांनी चक्कर खाल्लेली आहे. शिवाजीबरोबर सती गेलेल्या पुतळाबाईंनी महाराजांशी यथासमय २७ वर्षे वहिवाट नांदणूक केली आहे.

भोसल्यांचे घराणे फार मोठे प्रतिष्ठित, असे त्या काळी मानले जात नसे. हे विधान तारतम्याने घ्यायचे आहे. मालोजींची पत्नी फलटणकरीण होती. शिवाजीची एक पत्नी निंबाळकर आहे. त्याची आई जाधव घराण्यातील. एक पत्नी जाधव घराण्यातील आहे. त्या वेळी शिर्के घराणेही वजनदार होते. तेही जागिरदार होते. तत्कालीन शहाण्णव कुळींची घराणी कोणती, हेही एकवार पाहिले पाहिजे. मालोजी लखुजीच्या पदरी बारगीर होता. त्याने जिजाबाई-शहाजी विवाह दडपणाने घडविला, हा संदर्भ चुकीचा आहे, म्हणून घराण्याचा प्रतिष्ठितपणा थोडा तारतम्याने स्वीकारला पाहिजे.

शिवाजीच्या कर्तृत्वाची पार्श्वभूमी म्हणून शहाजी व त्याचा वारसा म्हणून संभाजी या साखळीत तीन माणसे पाहण्याची पद्धत आता इतिहासात रूढ झाली आहे. संभाजी दारू पीत असे, की नसे, त्याला नाटकशाळा होत्या, की नव्हत्या, त्याने सोयराबाई, अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे यांच्याशी जे वर्तन केले, ते समर्थनीय आहे का? त्याचा बदफैलीपणा स्वीकारार्ह, की नाही, हे प्रश्न अजून वादाचे आहेत. एका गोष्टीवर आता इतिहासकार वाद घालत नाहीत. ती म्हणजे मराठेशाहीला निर्णायक लढाई शेवटी मोगल सत्तेशी द्यायची आहे; विजापूरकर, कुतुबशाहीशी नव्हे, या निर्णयावर शिवाजी १६६० ते १६६४ या कालखंडात केव्हातरी आला. शाहिस्तेखानाची स्वारी हा केवळ आरंभ, ह्याची जाणीव शिवाजीला होती. आग्रा येथून सुटून आल्यानंतर, ही निर्णायक लढाई अजून पुढेच आहे, हे भान शिवाजीला होते. त्याच्या शेवटच्या काळात मोगल फौजा मराठी राज्याच्या सीमेवर जमत होत्या. ( १६६९ पासून) व स्वतः औरंगजेब ह्या मोहिमेसाठी दक्षिणेकडे येत आहे, ह्याची खात्रीलायक बातमी १६८० च्या जानेवारीपासून येऊ लागली. कारण दिल्लीत तशा तयाच्या सुरू झाल्या होत्या. मरणाच्या शय्येवर त्याचा प्रमुख विचार हा होता. कारण एव्हाना दीड लक्षाच्या आसपास सेना सरहद्दीवर उभ्या होत्या. शिवाजी वारला, त्या पंधरवड्यात सीमेवर चकमकी सुरू झाल्या होत्या. मोरोपंत पिंगळे, हंबीरराव मोहिते, अण्णाजी दत्तो हे तिघेही या आक्रमणाला तोंड देण्याच्या तयारीत होते. १६७९ पासून शिवाजी सतत दारूगोळा विकत घेत आहे, साठवीत आहे, हेही महत्त्वाचे आहे. हा फार दिवसांचा अपेक्षित हल्ला शेवटी १६८१त सुरू होतो. तीन लक्ष फौजा, नवीन राजा
सर्व बाजूंनी चढाई. सामनेवाला फोडाफोड कपटनीतींचा तज्ज्ञ व युद्धशास्त्राचा ज्ञाता. इतके असूनही १६८५ सालपर्यंतच्या अव्याहत लढाईचा निष्कर्ष काय? तर मराठी प्रदेशातून फौज मागे घेणे व विजापूर-गोवळकोंड्याकडे वळविणे. इथे संभाजीचे मुल्कीकारभार प्रवीणत्व, युद्धशास्त्रतज्ज्ञता, डावपेच, स्वत:च्या सेनेला प्रेरकत्व, हे सारेच पणाला लागले आहे. छत्रपतींच्या जीवनात प्रचंड फौजांशी धीमेपणे, कारभार विस्कळीत होऊ न देता लढण्याचा असा प्रसंग नाही. संभाजीचे मोजमाप करताना लहरी, रागीट, उतावळा, हट्टी ही बखरीची विशेषणे प्रमाण मानायची, की दीर्घसूत्री, धूर्त, खोल, धीमा, सावध ही डच, इंग्रज रिपोर्टातील विशेषणे प्रमाण मानायची, याचा निर्णय आपण केला पाहिजे. पुनः एकवार सांगतो की, मी संभाजी रंगेल, बदफैली होता, की नाही, यावर नव्हे, स्वभावविशेषावर लक्ष वेधीत आहे. या माणसाची पहिली २२-२३ वर्षे तुम्हांला रंगवायचीआहेत. व्यक्तिशः माझ्या मते संभाजी चरित्रानेही फारसा वाईट नव्हता. मराठा सरदारांना हुक्का, गांजा, अफू, दारू अशी माफक व्यसने त्या काळी असत. राजाराम सदैव अफूच्या नशेत असे. संभाजीला दारूची सवय होती. औरंगजेब स्वतः दारू मरेपर्यंत पीत होता. तिचा परिणाम राजकारणावर नाही. तसाच संभाजीचा प्रकार. त्याला आजोबाप्रमाणे नाचगाण्याचाही शौक होता. राजाराम, शाहू, शहाजीप्रमाणे त्याला नाटकशाळाही होत्या. एखाद-दुसरी बाई पळविण्याचे प्रकरण त्याच्या जीवनात आले असण्याचा संभव आहे. पण त्याबद्दल विश्वसनीय पुरावा नाही. संभाजीच्या बदफैलीपणाचा पहिला उच्चार १६९० नंतरचा आहे. १६७४ पूर्वी संभाजीच्या जीवनात कोणतीही भानगड नाही. या काळी तो आजीजवळ असे. हा वेळपर्यंतच्या पत्रांतून स्तुतीखेरीज त्याच्याविषयी काही ऐकू येत नाही. १६८९ साली संभाजी पकडला व मारला गेला. हा वेळपर्यंतच्या लढाईचा निष्कर्ष असा : दरम्यान संभाजीने पोर्तुगीजांचे ३/४ राज्य जिंकून स्वत:च्या प्रदेशाला जोडले. कर्नाटकातील राज्य दुप्पट झाले. सेना मूळच्या दुप्पट झाली. महाराष्ट्रात पाच-सहा किल्ले गेले. तीन-चार नवीन मिळाले. औरंगाबाद व बहाणपूर लुटले. गुजरातमध्ये औरंगजेबाच्या ७५ हजारच्या फौजा नुसत्या अडकून ठेवल्या होत्या (धनाजीने). मराठी राज्य म्हणजे १६४५ चे नव्हे. १६७४ चे नव्हे. १६८० चेही नव्हे. १६८१ ते १७०७ च्या प्राणांतिक, निर्णायक लढाईनंतर जे शिल्लक उरले, ते मराठी राज्य. शिवाजीच्या राजकारणाचा विकास संभाजीत दिसतो. तो पाहून घेतला पाहिजे.
शिवाजीच्या कार्याला मागे शहाजीची परंपरा आहे. प्रथम राजवाडे यांनी ह्या घटनेचा उच्चार केला. नंतर आयुष्यभर या कल्पनेला शेजवलकरांनी विरोध केला. शेवटी स्वत:ही ही कल्पना मान्य केली. डॉ. बाळकृष्ण आणि काळे यांनीही ह्या कल्पना स्वीकारल्या आहेत. ही कल्पना मान्य केल्यावाचून काही घटनांची संगती लागतच नाही. पहिली बाब म्हणजे, शहाजी निजामशाहीचा सरदार. त्याच्यासाठी निजामशाहीने लखुजी जाधव गमावला. तरी शहाजी १६२४ ला आदिलशहाकडे गेला. तिथे त्याने अफाट पराक्रम केला. पण १६२६ मध्ये तो निजामशाहीत परत आला. १६३० ला तो मोगल सरदार झाला. १६३२ ला पुन्हा निजामशाहीत आला. सर्व उलाढालींत आपली पुणे जहागीर त्याने संभाळली. फौजाही संभाळल्या. निष्ठा निजामशाही, आदिलशाही, मोगल यांच्याशी नव्हे, ती फक्त शहाजीशी. ही सवय आपल्या जहागिरीतील वतनदारांना त्यानेच लावली. दक्षिणेतील सर्व हिंदू-मुसलमानांचे हितसंबंध सारखे असून, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि सर्व सरदार यांनी परस्पर सहकार्याने मोगलांशी लढावे, त्यांना दक्षिणेत येऊ देऊ नये, ह्या धोरणाचा आरंभकर्ता शहाजी. पुढे खवासखान, मुरार जगदेव, अक्कण्णा, मादण्णा यांनी हे धोरण स्वीकारले. शिवाजीने वेळोवेळी ह्या धोरणांचा स्वीकार व उच्चार केला. संभाजी तर स्वत:ला कुतुबशाही-आदिलशाहीचा पालकच समजे.
शहाजीने पुणे जहागिरीचा कारभारी दादोजी कोंडदेव नेमला. स्वत:ला कर्नाटकची जहागिरी घेऊन, तिचा कारभार वडील मुलगा संभाजीसाठी व पुणे धाकटा मुलगा शिवाजीसाठी, ही वाटणी शहाजीने १६३६ लाच केली. दादोजीला ह्या भागात
आदिलशाही सुभेदार करून १५-२० किल्ले, दोन-तीन हजार फौज, शिवाजीला उपलब्ध करून देण्याचा उद्योग शहाजीचाच. शिवाजीला पुण्याला पाठविताना पेशवे, मुजुमदार, डबीर, सबनीस शहाजीनेच दिले आहेत. दादोजीच्या उपस्थितीत रोहिडेश्वरावर शपथाअहाणा झाल्या. हा प्रसंग ह्या पार्श्वभूमीवर समजून घेतला पाहिजे. शिवाजीच्या राजमुद्रेचे पहिले निर्णायक पत्र २८ जानेवारी, १६४६ चे आहे. १६ वर्षांच्या शिवाजीच्या मनात नवे राज्य निर्माण करण्याचा प्लॅन राजमुद्रेसकट तयार होता, ही गोष्ट जरा कल्पनेच्या पलीकडील आहे, पण खरी अडचण यापुढे आहे. राजवाडे यांनी पंधराव्या खंडातले, पत्र ४३७ छापले आहे. या पत्रावर शहाजीची राजमुद्रा आहे. पत्र २४ सप्टें., १६३९ चेआहे. पत्र अविश्वसनीय का? याचे उत्तर एकहीजण देत नाही. या वेळी शिवाजीचे वय ९ वर्षाचे आहे. इकडे शिवाजी रांगत होता. माती खात होता व तिकडे मराठी राज्याच्या उभारणीचा प्लॅन आखीत होता, असे तरी म्हणावे किंवा शहाजीच्या कर्तृत्वाची पार्श्वभूमी मान्य तरी करावी.
शहाजी कर्नाटकात एक स्वतंत्र राज्य जन्माला घालीत होता. इकडे महाराष्ट्रातही राज्य जन्माला घालीत होता. तो स्वत:ला राजा म्हणवीत होता. दरबार भरवीत होता. समकालीनविजापूर दरबारने हे नीट ओळखून १६४८ साली शहाजी गिरफ्तार केला; आणि इकडे कर्नाटकावर व तिकडे पुण्यावर दोन स्वतंत्र स्वाच्या काढण्यात आल्या. इकडे विजापूरकरांचा पराभव शिवाजीने केला. याचे गोडवे आपण गातो. तिकडे संभाजीनेही विजापूरकरांचा कडवा प्रतिकार करून पराभव केला, याची नोंद घेणे विसरतो. दोन्हीकडील तयाच्या, शिस्त शहाजीच्या आहेत. अजून शिवाजीच्या तालमीत तयार झालेली मंडळी उदयाला यायची आहेत. कावजी मल्हार यांनी ही लढाई प्रमुखत: लढविली. ह्या मंडळींना तालीम शिवाजीची नव्हे. यानंतर तह होऊन इ.स. १६४९ मे ला शहाजीजी सुटका झाली. त्या तहात शिवाजीने सिंहगड रिकामा करावा, ही अट आहे. विजापूरच्या सेनेचा मोड करणे निराळे व बाप कैदेतून सोडविणे निराळे. बखरकारांना व त्यांच्यावर विसंबून मते बनविणाच्यांना काय वाटेल, याचा विचार न करता शिवाजीने ह्या वेळी मोगलांशी सामोपचाराचे बोलणे लावले. सिंहगड रिकामा केला. तिकडे संभाजीने बंगळूर व कंदर्पा हे। किल्ले रिकामे केले व बाप सोडवला. बंगळूरला संभाजी व पुण्याला शिवाजी यांच्या सर्व वागणुकीमध्ये योजनाबद्धता व एकसारखेपणा दिसतो. त्याचे कारण मागे शहाजींची पार्श्वभूमी व त्यांच्या तालमीत तयार झालेले सरदार, कारभारी हे आहे. पुणे जहागिरीत शिवाजीच्या निर्णयाविरुद्ध शहाजींकडे अपील करण्याची प्रथा सर्रास रूढ होती. शिवाजीचा हुकूम कोणताही असो, अंमल अमुक प्रकारे व्हावा, असा निर्णय जिजाबाई देई. तोच पाळला जाई. हा प्रकार १६५३ पर्यंत दिसतो व शहाजीने दिलेला शेवटचा हुकूम १६५५ चा आहे. १६५५ पर्यंत बहुतेक महत्त्वाच्या प्रकरणी शहाजींचा निर्णय अंतिम मानला जाई. ह्या अनुमानास पुरावा आहे. शहाजीविरुद्ध विजापूरकरांकडे दाद मागण्याची प्रथा पुणे जहागिरीत नव्हती. या अनुमानालाही आधार आहे. शिवाजी अगदीच मोकळा नव्हता. मुलकी व लष्करी कारभारात त्यावर बंधन घालणारी, त्याला वळणावर ठेवणारी शक्ती होती. मुलकी कारभारात तर जिजाबाईच १६७४ पर्यंत महत्त्वपूर्ण काम करीत होती. शहाजीस घोरपडे याने दगा देऊन कैद केले, हा दंश जिजाबाई शेवटपर्यंत विसरली नाही. घोरपडेचा सूड घ्यावा, हा तिचा मनोदय पत्रद्वारे तिने शिवाजीला कळविला आहे. शिवाजीने बाजी घोरपडेला मारून मुधोळ लुटले. जिजाबाईला शहाजीचा अपमान किती झोंबत होता, याचा हा पुरावा जिजाबाईचे मन समजून घेताना महत्त्वाचा आहे.
चिटणिशी बखर म्हणते, कारभाराबाबत शिवाजी-जिजाबाई यांत मतभेद येत. शेवटी असे ठरले की, जिजाबाईने कारभारात लक्ष देऊ नये. पुराव्याने चिटणिसांचा मूर्खपणा दाखविता येतो.



मागे कर्तबगार शहाजी, पुढे कर्तबगार संभाजी, मध्ये महान निर्माता शिवाजी ह्या मानवी पद्धतीने शिवाजीचे मोठेपण समजून घेतले जावे. शिवाजीने स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. पण आपण रजपूत आहोत, या भूमिकेचा प्रारंभ शहाजी हा आहे. घोरपडे स्वत:ला सिसोदियावंशीय रजपूत म्हणत. आपण त्यांचे बिरादर आहो; म्हणून त्यांच्या इस्टेटीतआपला वाटा आहे, हा दावा शहाजीने १६४० सालापूर्वीच सरकारमान्य करून घेतला. खरे म्हणजे, भोसले रजपूत असण्याचे काहीच कारण नव्हते. पण एकदा शिपाईगिरी पत्करल्यावर मालोजी स्वत:ला श्रीमंत मालोजी राजे म्हणवू लागला. शहाजीने आपण रजपूत क्षत्रिय आहो, ही भूमिका कायदेशीर करून घेतली. या मागच्या पुराव्याचा उपयोग पुढे शिवाजीला झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजीने औरंगजेबाला पत्र पाठविताना, तो भारताचा सम्राट आहे, आपण सेवक आहो, असाच मायना लिहिला आहे. याचीही नोंद घ्यावी.

दादोजी कोंडदेव याने आत्महत्या केली, अशी भूमिका काही बखरींनी घेतली आहे. या भूमिकेचा उच्चार पुढे अनेकांनी केला आहे. सर्व पुरावा तपासून दि.वि. काळे यांनी आत्महत्या रद्द ठरविली आहे. शेजवलकरांनी पुन्हा एकवार आत्महत्या रद्द ठरविली आहे. उतारवयात आजारी पडून दादोजी स्वाभाविक मरणाने वारला, हीच गोष्ट अस्सल साधनांनी सिद्ध होते. म्हणून बखरीच्या भूमिकेत अर्थ नाही, असा शेजवलकरांचा निर्णय आहे. सध्या बेंद्रे आत्महत्या ठरविण्याच्या उद्योगात आहेत. आत्महत्येला अस्सल पुरावा ते कोणता देतात, पाहू. तूर्त तरी अस्सल साधने स्वाभाविक मरण, सभासद स्वाभाविक मरण. ९१ कलमी बखर स्वाभाविक मरण असे स्वरूप आहे. अस्सल साधनांत आत्महत्येला आधार नसेल, तर बखरींचे ढीग उपयोगाचे नाहीत.

आमचे बखरकार दंतकथेला फार महत्त्व देतात. एक सनपुरीची बखर म्हणून आहे. तिच्या मते महाराष्ट्रात पुंडावा फार झाला, म्हणून बाळाजी विश्वनाथने सुरक्षिततेसाठी येसूबाई व शाहू यांना दिल्लीला नेऊन औरंगजेबाच्या स्वाधीन केले. त्याची पुत्री बेगम म्हणाली : हा माझा धर्माचा लेक, बाबा हुजूर. तुमचा नातू. औरंगजेबाला बहुत खुशी झाली. त्याने पोराचे नाव सज्जन (शाहू) ठेवले. बाळाजीबरोबर फौजा दिल्या. त्या फौजा घेऊन बाळाजी महाराष्ट्रात आला. त्याने सर्व गुंडांचा बंदोबस्त केला. राज्य ठाकठीक केले. मग औरंगजेबाने शाहूचे लग्न केले व खूप इनाम देऊन महाराष्ट्रात पाठवून दिले व बाळाजीरावाला त्याचा प्रधान म्हणून काम पाहण्याची आज्ञा केली. सदर बखर मल्हार रामराव चिटणीस यांच्या बखरीपूर्व आहे .


अफजलखानाचा वध ह्या घटनेने कादंबरीकाराला आकर्षित करून घ्यावे, ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. ती घटना फक्त एका विशिष्ट कामाचा भाग आहे, इकडे कादंबरीकाराचे फारसे लक्ष नसते. १६४५ पासून शिवाजीच्या कार्याला आरंभ झाला व त्याने प्रथम सिंहगड हा महत्त्वाचा किल्ला जिंकला. लौकरच पुरंदर ताब्यात घेतला. १६४८ ला शिवाजीचा बीमोड करावा, म्हणून विजापूरने सेना पाठविल्या. १६४९ ला शहाजीशी तडजोड झाली. त्याच वेळी शिवाजीचे प्रस्थ वाढू नये, म्हणून अफजूलखानाला वाईचा सुभेदार करण्यात आले. तरी शिवाजीने जावळीचे खोरे १६५६ ला घेतलेच. या पार्श्वभूमीवर अफजलखान चाल करून येत आहे. शिवाजी शूर आहे. धाडसी आहे. प्रसंगी संधी साधून दगा-फटका करणारा आहे. आपले त्याचे जुने शत्रुत्व आहे. आपण त्याचा भाऊ मारला. आपला सूड घेणे ही शिवाजीची प्रतिज्ञा आहे, हे सारे ज्ञात असणारा अफजूलखान स्वतः शूर, धाडसी, कपटनीतिपटू होता. जावळीच्या खो-यात सेना मागे सोडून, हा एकाकी शिवाजीस भेटण्यास तयार कसा झाला, हेच माझ्यासमोर कोडे आहे. शक्तीच्या मस्तीत, आढ्यतेत गाफिलगिरी करणे ही खानाची प्रकृती नव्हे. काही फारशी साधने सांगतात की, भेटीच्या वेळी दगा-फटका होणार नाही, असे आश्वासन जिजाबाईने शपथपूर्वक दिले होते व जिजाबाईची करारी, सत्यनिष्ठ अशी ख्याती होती. मुलगा तिच्या ऐकण्यात आहे, अशी समजूत होती. वकिलामार्फत मिळालेल्या जिजाबाईच्या या आश्वासनावर विसंबून खान भेटीस तयार झाला. ही हकीकत समाधानकारक आहे; पण एकही विश्वसनीय साधनग्रंथ, बखर अगर तवारीख ही हकीकत देत नाही. उत्तरकालीन दुय्यम महत्त्वाच्या फक्त फारसी साधनांत या घटनेचा उल्लेख आहे.

शिवाजी सावधपणे अफजूलखानाच्या भेटीस गेला. अफजलखानाने दगा देण्याचा प्रयत्न केला, म्हणून शिवाजीने आतडी बाहेर काढली, ही मराठी बखरकारांची भूमिका पुराव्यावर टिकणारी नाही. अफजूलखानाचा निकाल लावून, आपली दहशत व कीर्ती वाढविण्याचा व विजापूरला जन्मभर ध्यानात राहील, असा धडा देण्याचा शिवाजीचा हेतू दिसतो. खान दगा देवो, न देवो, त्याला जिवंत सोडावयाचा नाही, हा निश्चय मनात धरूनच शिवाजी सगळी योजना आखीत होता. खानाचा मूळ हेतू पुण्याकडे कूच करण्याचा, पण शिवाजी प्रतापगडावर येऊन बसला व खानाशी बोलणी करण्यास तयार झाला. त्यामुळे खानाला जावळीच्या खो-यात जाणे भाग पडले. शिवाजी पुण्याकडे असता, तर लढणे सोपे होते. खानाने फोडाफोडीचे राजकारण केलेले होते. त्यात यश आले असते, तर मग शिवाजीचा पराभव सोपा होता. जावळीच्या खो-यात वाटाघाटीच सोयिस्कर, असा काहीतरी अदमास खानाचा असावा. खानाचा मोर्चा आपल्याकडे वळतो आहे, याची बातमी शिवाजीला मार्चच्या शेवटी लागली. खान विडा उचलून, फौजा घेऊन निघाला, तो थेट शिवाजीच्या मुलखात. ही मांडणी नाटकी आहे. मे-जून १६५९ मध्ये ठिकठिकाणी आदिलशाही फर्माने रवाना झाली. त्यांत शिवाजीच्या समाप्तीसाठी खानाची पाठवणी होत आहे, तुम्ही खानाला मदत करा, शिवाजीला कोणतेही साहाय्य करू नका, असे आदेश आहेत. शिवाजी पावसाळ्यापासून जावळीच्या खो-यात ठाण मांडून बसला होता. खानाचे आक्रमण सुद्धा व्यापक होते. त्याचे वेगळे सरदार शिवाजीच्या मुलुखात वेगळ्या भागांत ठाण मांडून होते. शिवाजीने या फौजांना कुठेही मैदानात तोंड दिलेच नाही. त्यामुळे वाटाघाटी भाग पडल्या.

शिवाजीची योजना अशी : प्रतापगडच्या पायथ्याशी खानाचा वध, प्रतापगडजवळील सेनेवर सिलीबकर व बांदल यांनी हल्ला करणे. जावळी-वाई मार्गावरील फौजा नेताजीने विध्वंस करणे, पारघाटकडील फौजांवर मोरोपंत पिंगळे यांनी हल्ला करणे. पन्हाळगड अचानक हल्ला करून घेणे, आणि शक्य त्या त्वरेने थेट विजापुरापर्यंत धडक देणे. या योजनेची पूर्ण आखणी निदान दोन महिने तरी चालू असावी. खानाने दगा दिला काय, न दिला काय, एवढी पूर्वतयारी वाया जाऊ देण्याइतका शिवाजी खचित मूर्ख नव्हता. प्रत्यक्षभेटीच्या वेळी काय घडले, खानाने शिवाजीची मान बगलेत दाबली, की नाही, या चर्चा मेलोड्रामासाठी ठीक आहेत. शिवाजीने हत्यार कोणते वापरले? तलवार, वाघनखे; की बिचवा? माझ्या मते तलवार, पण बिचवा व वाघनखे यालाही हरकत नाही.

डच रिपोर्टाच्या मते इकडे शिवाजी विजापूरवर धडक देत आहे. त्या वेळी प्रचंड फौजा घेऊन शहाजीही विजापूरवर चालून येत होता. पण कुठेतरी योजना हुकली. शिवाजीच्या फौजा विजापूरपासून सोळा मैलांवर आल्या व तीन दिवस वाट पाहून परतल्या. कर्नाटकातील फौजा एक आठवड्यानंतर आल्या व २० मैल मागूनच परतल्या. या डच रिपोर्टाला पूरक असा मजकूर फारसी साधनांतून आहे. (असे म्हणतात.) शिवाजीच्या राजकारणात हा शहाजीचा शेवटचा उल्लेख अफजूलखान वधाच्या बातमीपाठोपाठ विजापूर दरबारने नवी स्वारी रुस्तुम जमानीच्या आधिपत्याखाली काढली. पण तिलाही फारसे यश आले नाही. शिवाजी हा हिंदूंच्या इतिहासातील अपूर्व आणि अद्वितीय माणूस. त्यामुळे त्याची ओळख मित्रांना तर लौकर झाली नाहीच, पण शत्रूनाही झाली नाही. शिवाजी जास्तीत जास्त ओळखला असेल, तर औरंगजेबाने. त्याने आपल्या पहिल्या सुभेदारीच्या वेळीच आदिलशाहीला शिवाजीबद्दल इशारा दिला होता. दुस-या सुभेदारीच्या वेळी तर शिवाजीने जुन्नर, भिवंडी मारून औरंगजेबाला चुणूक दाखविलीच होती. त्याच वेळी शहाजहान आजारी पडल्याने आलमगीर उत्तरेत गेला. जाताना शिवाजीशी सुलूख करून गेला. जून १६५९ ला औरंगजेबाचे राज्यारोहण झाले. तिथे शिवाजीने आपला प्रतिनिधी पाठविलेला होता. औरंगजेबाने जुलैमध्ये शिवाजीला पोशाखही पाठविला. अशी सगळी गोडागोडी होती. जून १६५९ ला शाहिस्तेखान दक्षिणेचा सुभेदार म्हणून आला. पण इकडे शिवाजीने अफजलखान मारला व विजापूरशी त्याचे युद्ध जुंपले. हे पाहताच शाहिस्तेखान पुण्यावर चालून आला. विजापूरने शिवाजीला आवरण्याचा प्रयत्न म्हणून सिद्दी जोहारशी तडजोड केली व त्याला शिवाजीवर पाठविला. मराठी बखरकार, कादंबरीकार, अफजूलखान-शाहिस्तेखान-सिद्दी जोहार या राजकारणाचा परस्परसंबंध ध्यानात घेत नाहीत, ही माझी तक्रार आहे. या दृष्टीने पाहता, मी असे मानतो की, १६४५ ला जे सुरू झाले, ते १६४८ ला संपले, हा पहिला टप्पा. १६५६ ला जावळी खोच्यावरील आक्रमणापासून सुरू झाले, ते १६६६ ला संपले, हा दुसरा टप्पा. पहिल्या टप्प्यात सिंहगड घेणे, सोडणे, पुरंदर घेणे, फत्तेखान पराभव महत्त्वाचा. दुस-या टप्प्यात विजापूरशी तह. १६६० अखेर, हा पूर्वार्ध. ज्यात मोरे वध, खानवध, बाजी प्रभू ही प्रकरणे व आग्च्याहून परत येणे हा उत्तरार्ध, यात शाहिस्तेखान शासन, सुरत-लूट, जयसिंग ही पोटप्रकरणे.

अफजलखान-वध हा दगाबाजीचा एक प्रकार. शाहिस्तेखानाला शासन हा दगाबाजीचा दुसरा प्रकार. विश्वास देऊन, भेटीला बोलावून मारणे, गाफील सेनेवर हल्ला करणे, तहाची बोलणी लावून अंधारातून पळणे, यांतील काहीच रजपूत-धर्मात न बसणारे; पण झोपलेल्याला झोपेत मारणे, पळणाच्या नि:शस्त्रावर हत्यार चालविणे, आडवे आलेले हिजडे, दासी, स्त्रियांची कत्तल करणे हेही राजपूत-धर्मात न बसणारे. एकूण या कत्तलीत शाहिस्तेखानाचा मुलगा, जावई, खानाच्या काही बायका, काही सुना, काही मुली - एकूण ६ प्रतिष्ठित स्त्रिया, ६ सामान्य कुळंबिणी, ४० पुरुष, ज्यांत अनेक पहारेकरी खोजा (म्हणजे हिजडे) अशी मंडळी ठार झाली. हा शिवाजी परंपरागत क्षात्रधर्मात बसवू नये. त्यांची संगती कौटिल्याच्या राजधर्मात बसते.

परंपरागत क्षात्रधर्माच्या कल्पनेत शिवाजी बसविण्याचा उद्योग सिनेमात भालजी, कादंबरीत हरिभाऊ व नाथमाधव, नाटकात टिपणीस व आँधकरांनी केलेलाच आहे. या यादीत रणजित देसाईची वाढ होऊ नये, असे मला वाटते.

शाहिस्तेखानाची बोटे एप्रिलात कापली गेली (शिवाजीने रमजानचा फायदा घेतला. मुसलमानाचा हा न लढण्याचा, उपवासाचा महिना.); पण यामुळे शाहिस्तेखानाने धास्ती खाल्ली, हा बखरकारांचा तर्क. खानाने हा पराभव पुसण्याचा आटोकाट प्रयत्न पुढे सतत सहा महिने केला. या काळात पहिले तीन महिने त्याचा मुक्काम पुण्यासच होता. अनपेक्षित घाव घालून जग थक्क करता येते. लोकांना थक्क करण्याचे काम सर्कसपटू व गारुडी करीतच असतात. तो शिवाजीचा धंदा नव्हे. थक्क अवस्थेतून भानावर येण्यापूर्वी शिवाजी काही स्थिर कामे करीत असतो. विजयोत्सव करीत नाही. खान-वधामागोमाग पन्हाळा, कुडाळ जिंकून विजापूर मार्गे कूच आहे. शाहिस्तेखान प्रकरणामागोमाग राजापूर, कुडाळ, वेंगुर्ला जिंकून कोकणपट्टी साफ करणे आहे. स्थायी यश मिळणाच्या मोहिमेचा आरंभ म्हणून अनपेक्षित धक्क्याला अर्थ असतो. अनपेक्षित धक्का देऊन थक्क करणे व भानावर येण्यापूर्वी काही स्थिर विजय मिळविणे हा राजकीय वास्तववाद - म्हणजे शिवाजी. पुढच्या सहा महिन्यांत शिवाजीला आवर घालण्यास असमर्थ ठरल्यामुळे औरंगजेबाने शाहिस्तेखानास बंगालचा सुभेदार केले. ‘सरप्राईजेस्' वर आलमगिराची तक्रार नाही. पण पुढे तरी काय? हा त्याचा वास्तववादी प्रश्न आहे. ऑक्टोबरमध्ये (१६६३) शाहिस्तेखान गेला. जानेवारीत शिवाजीने सुरत लुटली. अफजलखानाच्या वधापूर्वी शिवाजीला अखिल भारतीय कीर्ती नव्हती. या प्रकरणामुळे शिवाजीची कीर्ती आसामपर्यंत गेली. सुरत लुटून शिवाजीने आपले औरंगजेबाशी युद्ध जाहीर केले. शाहिस्तेखान प्रकरण महत्त्वाचे खरे, पणते भारतभर गाजले नाही. ह्या घटनेची भारतभर चर्चा दिसत नाही.

मिझराजे जयसिंगाबाबत बखरकार, कादंबरीकार व इतिहासकार सर्वांनीच घोळ केलेला आहे. या कसलेल्या सेनानीच्या मनात कुठेतरी शिवाजीविषयी मृदुभाव सर्वांनी गृहीत धरला आहे. अगदी अलीकडे मिझराजे यांची सुमारे २६ महत्त्वाची पत्रे उपलब्ध झाली आहेत. १६६५-६६ मधील. त्यांवरून असे दिसते की, मिझराजे औरंगजेबाच्या अत्यंत विश्वासातील गृहस्थ. मिझच्या शब्दांना आलमगीर फार मान देत असे. वारसाहक्काच्या लढाईपासून त्यांची आलमगिराला मदत झाली. मिझची शिस्त अत्यंत करडी - प्रत्यक्ष राजपुत्रांना त्यांनी शिक्षा दिल्या आहेत. पण बापाने दर वेळी पुत्रांच्या विरोधी जयसिंग उचलून धरला आहे. औरंगजेबाशी नात्याने निकट असणाच्या व जनानखान्यात वजन असणाच्या एका सरदाराला मिझनी उन्हात उभे करून छड्या मारल्या; पण आलमगिराने ही वेळ आणल्याबद्दल त्या सरदाराची कानउघाडणी केली. शिवाजीला भेटीसाठी आग्रयास बोलवावे, हा सल्ला मिझचा. तो आलमगिराने मान्य केला. शिवाजीस तिकडेच नजरकैद करावे, हाही मिझचाच सल्ला, त्याच्या जिवाला धोका पोचू नये, हाही त्याचाच सल्ला. हा शेवटचा सल्ला त्या वेळी आपण ऐकला, ही आपली जन्मातली सर्वांत मोठी चूक झाली, असे औरंगजेबाने कैक वेळा म्हटले आहे. शेवटच्या काळात पुत्राला उपदेश करतानाही म्हटले आहे. मिझराजे यांची भूमिका अशी : शिवाजी आग्रा येथे आहे, तोवर मराठे त्याचा जीव सुरक्षित राहावा, म्हणून गप्प बसतील. शिवाजी मारला, तर चिडून प्राणपणाने लढतील.

शिवाजी सोडला, इथे महाराष्ट्रात असला, तर त्रास देईल, असे मिझचे म्हणणे आहे. शिवाजीने आग्च्याकडे कूच केले आहे. लौकरच तो दरबारात पोचेल, या जयसिंगाच्या पत्राला आलमगीर उत्तर देतो. ‘तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्याचा योग्य सन्मान करू. आदिलशाहाविरुद्ध लढण्यासाठी तुम्हांला त्याची गरज लागेल. आम्ही फार दिवस न लावता लौकरच त्याला निरोप देऊ. त्याच्या उत्तरी जयसिंग कळवितो, ‘मी प्रयत्नपूर्वक त्याला आपल्या पेशीत रवाना केला आहे. माझे पत्र आल्याविना त्यास इकडे येऊ देऊ नये. तिथेच बंदोबस्त ठेवावा. प्राणाला धोका होऊ नये’, इ.इ. जयसिंगाचे चित्र रेखाटताना हे ध्यानी घ्यावे. व्यक्ती जयसिंग वत्सल आहे.

९ वर्षांचा संभाजी ओलीस ठेवून घेणे त्यांना प्रशस्त वाटत नाही. बाल संभाजीच्या वागणुकीचे त्याला फार कौतुक वाटते. सेनानी, राजकारणी जयसिंग घणाघाती व कठोर आहे. शिवाजीने प्रथम त्याचा प्रतिकार करून पाहिला, तो शक्य नाही, हे कळल्यावर तह केला. मिझनी मारेकरीही पाठविले आहेत. तहाची कलमेही पाहण्याजोगी आहेत. तेवीसकिल्ले, चार लक्षांचा प्रदेश मोगल राज्यात खालसा. बारा किल्ले व एक लक्षाचा मुलूख शिवाजीकडे राहावा- औरंगजेबाचा जहागिरदार सरदार म्हणून व शिवाजीने यापुढे मोगल राजाशी एकनिष्ठेने सेवा करावी. हा तह शिवाजीने मोडू नये, म्हणून मोगल छावणीत १८ जूनपासून संभाजी. तहाप्रमाणे प्रथम मिझने किल्ले ताब्यात घेतले. मगच शिवाजीला आग्च्याला पाठविले.

मिर्झा औरंगजेबाचा सरदार होता. सर्व शक्तीने व बुद्धीने तो एकनिष्ठ सेवा करीत आहे. त्याने शिवाजी समूळ समाप्त केला होता. ही शक्ती, हा एकनिष्ठ क्रूर कठोरपणा व खासगी जीवनात संभाजीविषयी वाटणारे वात्सल्य,हे कॅरेक्टर रंगविण्याला एक आव्हान आहे; आणि हा माणूस कट्टर धार्मिक व पूर्ण श्रद्धाळू हिंदू होता. शिवाजीविरुद्ध जय मिळाल्यास ९१ मणांची सोन्याची साखळी काशीविश्वेश्वरास वाहण्याचा त्याने नवस केला होता, अशी आख्यायिका आहे.

शिवाजी आग्रा येथे नजरकैद होता, म्हणजे काय, याचाही नीट अर्थ समजून घ्यावा. (शिवाजी-औरंगजेब भेट गुसलखान्यात झाली. गुसलखाना म्हणजे स्नानगृह नव्हे. ‘परामर्शगृह’, आजच्या पद्धतीप्रमाणे चेंबरमध्ये भेट झाली.) बहुधा फारसी साधने म्हणतात, त्याला राजधानीत फिरण्याची परवानगी होती, त्याचा मुक्काम बागेत होता. शिवाजी पळाला कसा, हे न उलगडणारे कोडे आहे. तो पेटाच्यातून पळाला, असे म्हणतात. व्यक्तिशः माझा त्यावर विश्वास नाही. पुराव्याच्या विरोधी न जाणारे सर्वमान्य कल्पित म्हणून कादंबरीकार पेटाच्याच्या स्वीकारास मोकळा आहे. १७ ऑगस्टला शिवाजी पळाला. आग्रा येथून ११६ मैलांवर असणारी नरवीर घाटी त्याने २० ऑगस्टला ओलांडली, ती जाहीरपणे ३०० माणसांसह, बादशाही परवाना दाखवून त्याने ओलांडली, हे पुराव्याने सिद्ध आहे. याचा सोपा अर्थ असा, ‘मी शिवाजी आहे’ हे सांगून बादशहाची दक्षिणेत परतण्याची परवानगी दाखवून, इतमामाने शाही साधने दिमतीला घेऊन शिवाजीने नरवीराची घाटी ओलांडली. वेशपालट, काशीयात्रा, मथुरा, वृंदावन, प्रयाग, हा मार्ग बखरीचा. शिवाजी १२ सप्टेंबरपर्यंत रायगडला पोहोचला असावा, असे इतिहासकाराचे म्हणणे आहे. बरोबर संभाजी नव्हता. शिवाजीने त्याची उत्तरक्रियाही केली. ही बातमी औरंगजेबाला ऑक्टोबरअखेर मिळाली. या वेळेपर्यंत मोगल प्रदेशात शोधाशोध सुरू होती. त्यानंतर ती बंद झाली. नंतर संभाजी आला. (सुमारे २० नोव्हेंबर.)
यानंतरच्या प्रकरणातील आवडते प्रकरण तानाजीचे आहे. तानाजी हा शिवाजीचा एक
शूर व निष्ठावान सरदार. हा सिंहगड घेताना मारला गेला. इतकेच या प्रकरणी सत्य आहे. तुळशीदासाच्या पोवाड्यामुळे या प्रकरणाला भलतेच महत्त्व आहे. हा शिवाजीचा बालमित्र होता, त्याला पुरावा नाही. शिवाजीच्या सैन्यात याला फार मोठे महत्त्व होते, असेही नाही. हशमाचा (पायदळाचा) एक सरदार. त्याच्यामुळे कोंडाण्याचे नाव सिंहगड ठेवले, ही थापच. सिंहगड हे नाव यापूर्वीच कागदपत्रांत आहे.
|१६७० फेब्रुवारी ते ५ जून या महिन्यांत सिंहगड, पुरंधर, माऊली, कर्नाळा, लोहगड, हिंदोळा, रोहिडा, इत्यादी गड घेण्यात आले आहेत. बहुतेक ठिकाणी मराठे घोरपडी व माळा लावून चढले. ईष्र्येने लढले. १६७६ साली अण्णाजी दत्तो यांनीही माळा लावूनच पन्हाळा जिंकला. त्या वेळी तर केवळ ६० लोक घेऊनच ते आत गेले होते. लगेच कापाकापीस आरंभ झाला. घोरपड आणि माळा लावून किल्ल्यात घुसणे व बेसावध मंडळींवर हल्ला करून त्यांना कापणे आणि मुख्य दरवाजा उघडून गड सर करणे, ही मराठी फौजेची नेहमीची रीत. इतिहास एखाद्या प्रकरणाची जादू समाप्त करतो, त्यांतील हे एक .
इ. स. १६७४ला शिवाजीने स्वत:ला राज्याभिषेक करण्यासाठी हजार प्रयत्न करून, आपले क्षत्रियत्व त्याने सिद्ध केले. मुंज केली. प्रायश्चित्ते घेतली. स्वत:च्या पत्नींशीच नव्याने लग्ने केली. अभिषेकाचा इतका खटाटोप शिवाजीने का केला, असा प्रश्न आहे. बेंद्रे यांचे म्हणणे असे की, ब्राह्मण गुन्हेगारांना शासन करणे, धार्मिक प्रश्नांवर निकाल देणे हा अधिकार यावा, म्हणून शिवाजीने राज्याभिषेक करून घेतला. माझे म्हणणे असे की, तो काळ धार्मिक प्रभाव आणि वर्चस्वाचा काळ आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राज्याभिषेकाला पावित्र्य आणि प्रतिष्ठा आहे. राजा म्हणजे मुसलमान, ही त्या वेळची समजूत आहे. दिल्लीपती हा सर्व भारताचा स्वयंभू सम्राट मानला जाई. यामुळे बहामनी घराणे वैभवात असतानाही जनतेला व खुद्द बहामनी वजिरांना आपल्या राज्याचा सम्राट दिल्लीपती व त्याचा अधिपती इराणचा खलीफा वाटे. भारताचे आधिपत्य मिळाल्यानंतरही हे आधिपत्य इराणकडून मान्य करून घेणे अल्लाउद्दिनाला इष्ट वाटले. औरंगजेबाच्या वेळी खलीफा तुर्की होता. त्याची मान्यता आपल्या आधिपत्याला मिळावी, याचा आटोकाट प्रयत्न आलमगिराने केला. शेवटी ती मिळाली, तेव्हा आनंदोत्सव दरबार केला. आदिलशाही, कुतुबशाही, राजांना व सरदारांनासुद्धा दिल्लीपती हा आपल्या पादशाहीचा सम्राट वाटे. शिवाजीच्या वेळी अनेक रजपूत राजे होते. त्यांचे मंचकारोहण होई व तख्तनशीनीचा समारंभही होई. राज्याभिषेक नव्हता. विजयनगरचे साम्राज्य स्थापन झाले. वैभवाला चढले.
पण वैदिक विधिपूर्वक राज्याभिषेक नाही. इ. स. १००० च्या नंतर हा वैदिक विधीच लुप्त झाला होता. गागाभट्टाने धर्मग्रंथ पाहून तो नव्याने सिद्ध केला व शिवाजीला राज्याभिषेक केला. ही एक क्रांतिकारक घटना होती. एकीकडे राम, नल, युधिष्ठिर, विक्रमादित्य या परंपरेशी या कृतीने शिवाजी आपला सांधा जोडीत होता. (पाहा सभासद.) दुसरीकडे अखिल भारतातील हिंदूंच्या धर्मनिष्ठा व धर्माचे सारे पूज्यत्व व पावित्र्य स्वत:मागे उभे करीत होता. आमच्या धर्मशास्त्राप्रमाणे सत्य युगात चार वर्ण असतात. द्वापरयुगात वर्णसंकराला आरंभ होतो. त्रेतायुगात तीन वर्ण राहून संकर वाढतो. कलियुगात ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण राहतात. आमच्या पुराणाप्रमाणे नंद घराणे संपले आणि क्षत्रिय संपले. तिथून पढे शद्रराजे आरंभ झाले. शिवाजी जण इतिहासाचे चाक. मस्लिमपर्व जागेपर्यंत मागे सरकवून हिंदूंचा वेदपुराणांचा व स्मृतींचा व सर्व हिंदू वैभवाचा स्वत:शी सांधा जोडून, नवे युग सुरू झाल्याची द्वाही फिरवू इच्छीत होता. शिवराज्याभिषेकाकडे तात्कलिक सोयीचा भाग म्हणून न पाहता, त्यामागची भव्यता समजून घेतली पाहिजे. अभिषेक-विधी बेंद्रे यांनी संपादन केला आहे. (गागाभट्टविरचित शिवराज्याभिषेक प्रयोग, संपादक वा. सी. बेंद्रे, मूल्य ३-०० प्रकाशक, पी पी एच्. बुकस्टॉल, मुंबई ४) आपण आपल्या कादंबरीत या प्रसंगाची सर्व भव्य, पवित्र भूमिका ठसठशीतपणे मांडावी, असे मला वाटते.
स्वत:ला वैदिक मंत्रांनी अभिषिक्त करून घेण्याची कल्पना शिवाजीच्या मनात केव्हापासून आली असावी? मला वाटते, ती फार पूर्वीपासून असावी. कारण त्याने प्रधानाचा शिक्का असा घेतला आहे : शिवनगरपती हर्षनिधान सामराज मतीमत् प्रधान. हा शिक्का १६५३ पासूनचा आहे. यातील हर्षनिधान या विशेषणाला संस्कृत काव्यवाङ्मयाची पार्श्वभूमी आहे. अभिषिक्त राजा म्हणजे सर्वांना अभय व न्यायाची हमी, प्रजेच्या नियमाची व सुखाची हमी. मात्सन्यायातील दुःखापासून प्रजेची सुटका, अशी वर्णने कौटिल्यापासून आहेत. काव्यातही आहेत. अर्थात हे एक माझे अनुमान.
शिवाजीच्या शेवटच्या काळात गृहकलह बराच दिसून येतो. सर्व मंत्रिमंडळ व सोयराबाई ह्यांची एक बाजू. पट्टाभिषिक्त राणीचा मुलगा राजाराम, उत्तराधिकारी व्हावा, असे या फळीचे म्हणणे. सेनापती, सेना व संभाजी यांची एक बाजू. त्या संघर्षाचा उदय जिजाबाईच्या मरणानंतर आहे. संभाजीची आई त्याच्या जन्मापासून आजारी होती. अफजलखान-वधाच्या प्रसंगी शिवाजीच्या एकुलत्या एका पुत्राची माता मरणशय्येवर होती. आईविना असलेल्या या मुलाचे सारे संगोपन जिजाबाईजवळ झाले.बिापाला घरात लक्ष
देण्यास वेळच नव्हता. त्यामुळे पितापुत्रांचे फारसे सामंजस्यही नव्हते. हे खरे मानले, तरी । राज्याचे दोन वाटे करावे, कर्नाटकाचे संभाजीस, महाराष्ट्राचे राजारामास हा उत्तरकालीन प्रक्षेप आहे. शिवाजीच्या शेवटच्या काळात मोगलांच्या फौजा सरहद्दीवर जमत आहेत.
राज्याचे आधारस्तंभ मंत्री आणि वारस संभाजी, यांत सूत नाही. घरी सोयराबाईंची धुसफूस चालू आहे आणि शिवाजी रुग्ण आहे. ही परिस्थितीच फार भयावह आहे. आयुष्यभर खपून जो विजय मिळविला, त्याची फळे पदरात पडत असताना माधवराव मरणाच्या दारात प्रवेश करीत होता. या घटनेपेक्षा, जन्मभर मिळविले, त्याला निर्णायक आव्हान मिळण्याची वेळ आली. त्या वेळी आपण आजारी, मंत्री व युवराज यांत बेबनाव ही परिस्थिती अधिक दु:खाची आहे. इतिहासाने जे कर्तव्य शिरावर दिले, ते पार पाडून व पार पाडताना आपण मरतो आहो, याचे समाधान तरी माधवरावाला आहे. शिवाजीला तेही नाही. विशेषतः, आजारीपणाच्या शेवटच्या अवस्थेत (शेवटच्या पंधरवड्यात) त्याचा गडावर ताबा राहिला नव्हता. नाहीतर संभाजीला भेटीसाठी निश्चित बोलाविले गेले असते.
शिवाजीच्या मृत्युसमयी संभाजी पन्हाळा, प्रभावळी व दाभोळ या विभागाची सरसुभेदार होता. नजरकैदेत नव्हता. ही बाब पुराव्याने सिद्ध आहे. ती ध्यानात असू द्यावी.
सोयराबाईने शिवाजीला विषप्रयोग केला होता, या मताला अस्सल पुरावा नाही. संभाजीने सोयराबाईवर असा आरोप केला व भिंतीत चिणून ठार केले, असे बखरीचे म्हणणे आहे. ते पुराव्याने खोटे सिद्ध करता येते. संभाजी गादीवर आल्यावर सोयराबाई १९ महिन्यांनी वारली. तिने आत्महत्या केली व संभाजीने शाही इतमामाने तिची उत्तरक्रिया केली, याला इंग्लिश रिपोर्ट्स मध्ये पुरावा आहे. १६७७ साली शिवाजीने विषप्रयोगावर उताच्याची औषधे इंग्रजांच्याकडून मागविली, हा पुरावा. यावरून महाराजांना आपणांस विषप्रयोग झाल्याची शंका असावी, हे अनुमान व त्यावरून कोणीतरी विषप्रयोग केला असेल, हे पुढे अनुमान. त्यावरून सोयराबाईने विषप्रयोग केला असावा, हा तर्क. शिवाजीला विषप्रयोग होऊन तो मेला, अशी बातमी १६७६ नंतर दर महिन्या-दोन महिन्याला उठे. हा उपोद्बलक पुरावा. माझ्या मते १६७७ ला जर असे काही झाले असते, तर शिवाजीने शंका आली, त्यावर कठोर इलाज केला असता. निदान सोयराबाईला कायम पुरंधर किंवा सिंहगडला हवा-पाण्याचे निमित्त म्हणून दूर ठेवले असते. उलट, असे दिसते की, १६८० त ७ मार्चला राजारामाची मुंज लावली. १५ मार्चला त्याचे लग्न लावले. या दोन्ही कार्यास सोयराबाईची इच्छा नाही, म्हणून संभाजीलाबोलाविले नसले पाहिजे. म्हणजे सोयराबाई जवळ हवी व छोट्या प्रकरणी तिला दुखवणे नको, हीच शिवाजीची इच्छा आहे. मार्चच्या शेवटी शिवाजी आजारी पडला व तीन एप्रिलला तो वारला. या आजाराचे स्वरूप गुडघीचे नसून, ‘ब्लडीफ्लुक्स' म्हणजे रक्ताची उलटी, परसाकडे असे आहे.
९१ कलमी बखरीने केलेले, ‘शेवटी हरिकीर्तने, रुद्राक्षधारण' हे वर्णन मला विश्वसनीय वाटते. याखेरीज मी कुणीही न उल्लेखलेली बाब सुचवितो. ती म्हणजे, महामृत्युंजयाच्या जपासाठी काही ब्राह्मण बसविलेले असावेत. जीव जाताना पांढच्या घोंगडीवर ठेवणे, गंगाजळ, तुळशीपत्र तोंडात घालणे. जीव जाताच मांडी मोडून पद्मासन करणे ह्या सर्व बाबी त्या काळीही होत्या. भोसले घराण्यात सतीची प्रथा दिसत नाही. पुतळाबाई हा अपवाद. ती प्रत्यक्ष दहनावेळी सती गेली नाही. कारण प्रत्यक्ष दहन एक प्रकारे गुपचूप, घाईगर्दीने उरकले आहे. बहुधा शिवाजीस या मंडळींनी भडाग्नी दिला असावा. पुढे संभाजीने सर्व क्रिया १२ दिवसांपर्यंत- सुतक यांसह विधिपूर्वक केल्या आहेत. त्याने दर्भाच्या शिवाजीला मंत्राग्नी दिला.
शिवाजीविषयी कादंबरी लिहिताना शिवाजी-इंग्रज संबंध व शिवाजी-पोर्तुगीज संबंध यांकडे सदैव दुर्लक्ष होते. यामुळेच शिवाजीने आरमार उभे करण्याचा प्रयत्न १६५६-५७ पासून सुरू केला, याही गोष्टीकडे दुर्लक्ष होते. पहिला अखिल भारतीय कीर्तीचा पराक्रम करण्याआधीच इकडे आरमार-उभारणी व तिकडे राज्याभिषेकाचा मनात संकल्प, ही गोष्ट शिवाजीचे मन, आकलन व त्याच्या उद्योगाचा आवाका समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहे. १६५९ पासून शिवाजीच्या आरमाराबाबत सावधगिरीचे हुकूम पोर्तुगीजांनी सोडलेले आढळतात. विजयनगर, बहामनी, आदिलशाही, निजामशाही, मोगल या राजवटींना डोळ्यांसमोर पोर्तुगीज दंडेली दिसत होती. पण कुणीही आरमाराकडे लक्ष दिले नाही. या मुसलमान शाह्यांचे आरमाराच्या प्रश्नाकडे लक्ष वळते, तर इतिहास बदलता. ११ व्या शतकातला चोलराजा राजराज हा आरमाराकडे लक्ष देणारा शेवटचा हिंदू राजा. त्यानंतर १५ व्या शतकात संगमेश्वराचा एक जखुराय नावाचा जागिरदार. पण आरमार या घटनेचे राजकीय महत्त्व ओळखणाच्या चोलराजा राजराज नंतर ६०० वर्षांनी फक्त शिवाजीच. या दृष्टीने १६६४ ला सिंधुदुर्गाची उभारणी, १६६५ ची बसनूरची स्वारी ह्या घटना महत्त्वाच्या आहेत. भारतात कायम झालेली पहिली युरोपीय सत्ता पोर्तुगीजांची. ती रोमन कॅथॉलिक असल्यामुळे धर्मच्छलासाठी फार प्रसिद्ध. शिवाजीच्या आधी ५० वर्षे पोर्तुगीजांनी इन्क्वीझिशनही सुरू केले होते. शिवाजीच्या वेळी तोही छळ चालूच होता.


१६६७ साली शिवाजीने पोर्तुगीजांना धडा शिकविला. हे पोर्तुगीजविरोधी राजकारण पुढे संभाजीने सदैव रेटीत नेले. या पोर्तुगीजविरोधी लढ्याचे कारण राजकीय होते, तसेच, स्पष्टपणे धार्मिकही होते. शिवाजीच्या काळी इंग्रजांची शक्ती अजून फारशी वाढली नव्हती. तरी शिवाजीने इंग्रजांवर दाब म्हणून खांदेरीला तटबंदी केलीच, पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच यांच्याशी शिवाजीची वागणूक पाहूनच स्वभावरेखन करताना शिवाजीच्या बुद्धीचा पल्ला ठरविता येईल. त्याच्या मनाची घडण सांगता येईल.

शिवाजीला कुणी बालमित्र असतील, असे वाटत नाही. ‘शेषप्रश्न' या कादंबरीत सव्यसाचीची अशी स्वभावरेखा आहे, त्याच्याशी मिळतीजुळती शिवाजीची आहे. सव्यसाचीवर प्रेम करणारे आहेत, श्रद्धा ठेवणारे आहेत. त्याच्याशी वाद घालणारे आहेत. सर्वांच्या रक्षणाची जाणीव सव्यसाचीला आहे. चुका करणाच्यांबाबत त्याला अनुकंपा आहे. आपण जे काम करतो, त्याला सर्वांनी साहाय्य करावे, असे त्याला वाटत नाही. ‘कवींनी क्रांतिगीते गाऊ नयेत. त्यांनी स्फुरतील, ती गाणी गावीत. सांसारिकांनी चोख संसार करावा. शोधकांनी शोध लावावेत. सर्वांची जीवनाला गरज आहे. पण माझे काम फक्त देश स्वतंत्र करण्याचे आहे. असे सव्यसाची मानतो. देशहितासाठी गरज नसेल, तर मोठमोठ्या अपराधाला तो सहज क्षमा करतो; आणि गरज पडेल, त्या वेळी निरपराधांची कत्तल ही सुद्धा साहजिकच आहे, असे त्याला वाटते. या सव्यसाचीला जिवाभावाचा कुणी मित्र नाही. तो आदरणीय, पण एकाकी आहे. सव्यसाची एकवार बारकाईने वाचावा, अशी सूचना आहे.

शिवाजीने हिंदू सरदार, जहागिरदार यांना मित्र करण्याचा सदैव प्रयत्न केला. दौलतराव मोरे, यशवंतराव मोरे, लखम सावंत, शृंगारपूरचा सुर्वे अशी अनेक उदाहरणे आहेत. पण समकालीन वतनदारांनी शिवाजीला कधीच साथ दिली नाही. शिवाजीला व पुढे बाजीरावाला नवे सरदार आणावे लागले. संपूर्ण आयुष्यभर हिंदू सरदार नेकीने

आदिलशाही, मोगल यांच्याशी वागले. त्यांच्या डोळ्यांसमोर एक हिंदू राज्य घडत होते. पण त्यांना आस्था वाटली नाही. शक्यतर वैषम्य व असूयाच वाटली. समकालीनांना त्याचा ध्येयवाद किती पेटवू शकला, याचे हे उदाहरण आहे. नवी तरुण पिढी मात्र पेटून उठलेली दिसते. १६६९ साली अफजलखानाला, १६६५ साली जयसिंगाला फाडाफोडीच्या राजकारणात फारसे यश आले नाही, हा त्याचा अप्रत्यक्ष पुरावा. प्रत्यक्ष ३ लक्ष फौज घेऊन औरंगजेबाला महाराष्ट्र २७ वर्षे प्रयत्न करूनही जिंकता आला नाही, हा देखील.

शिवाजीपासून प्रेरणा घेणारा एक छत्रसाल बुंदेला दिसतो. याच काळात पंजाबात औरंगजेबाविरुद्ध शीख प्राणपणाने झगडत होते. आर्य समाजाच्या उदयानंतर व आर्य समाजीयांनी केलेल्या कठोर टीकेमुळे ‘आपण हिंदू नव्हेत’ अशी भूमिका शीखांनी एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी घेतली, पण सोळाव्या-सतराव्या शतकांत शीख हिंदुधर्मरक्षणासाठीच लढत होते. दुर्दैवाने शिवाजी व शीख यांचा संबंध दिसत नाही. संभाजीने हा जोडला. शीखांचे दहावे गुरू गोविदसिंग औरंगजेबाविरुद्ध लढतच होते. मराठ्यांशी संबंध जोडण्यासाठी ते दक्षिणेत आले. त्या वेळी १७०८ साली त्यांचा वध झाला. मराठे आणि शीख यांचा संबंध काहीच नसावा, ही एक दुर्दैवी घटना आहे.
शिवाजीविषयी कादंबरी म्हटल्यावर अजून काही घटना निश्चित समजून घ्याव्या. पैकी एक, शिवाजी-तुकाराम संबंध आहे. तुकाराम १६०८ ते १६५१ या काळात होऊन गेला. त्याचे गाव देहू-पुणे जहागिरीत होते. शिवाजी तुकारामांच्या कीर्तनास जात असे. लोहगड येथील मंदिरात शिवाजी कीर्तन ऐकत होता. महंमद बंगशाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, इ.इ. सर्व आख्यायिका थापा आहेत. तुकारामाने शिवाजीस रामदासांचा उपदेश घेण्याविषयी सांगितले, हीही थापच. रामदासी संप्रदाय १६४९ ला कायम झाला. चाफळच्या पंचक्रोशीबाहेर तुकारामांच्या हयातीत रामदासांचे नाव गेले नव्हते. तुकारामाचा पांडुरंगमंदिर इनामाचा खटला शिवाजीसमोर चालला. त्याचा निर्णय शिवाजीने तुकारामाविरुद्ध दिला आहे. देहूला असणारे मराठेशाहीचे योमिये शाहूकालीन आहेत. शिवाजीच्या चरित्रात तुकारामाला कुठे जागाच नाही. यासंबंधीचे गाथ्यात उल्लेख आहेत. ते सारे प्रक्षिप्त आहेत. उदा., ‘वान् किति रे सदया विठूराया दीनवत्सला' हा अभंग, परंपरा मानते की, लोहगडमंदिर कीर्तनाच्या वेळचा आहे. पण हे खोटे आहे. तो अभंग प्रल्हाद चरित्रातील आहे. तुकारामांच्या हयातीत शिवाजीला वजनही आले नव्हते. मोठा पराक्रमही त्याने केला नव्हता. अजून रामदास प्रसिद्धीलाही आलेला नव्हता.
रामदास यापेक्षा निराळा आहे. शिवाजी-रामदास प्रत्यक्ष भेट इ.स. १६७२ साली झाली, हे निश्चित. १६७६ ला शिवाजीने समर्थांच्यासाठी सज्जनगड मोकळा करून दिला, हेही निश्चित. चाफळच्या यात्रेला त्रास होऊ नये, म्हणून १६६८ ला ताकीद दिली, हेही निश्चित. रामदासाची सर्वांत जुनी चरित्रे मेरुस्वामी, दिनकरस्वामींची. त्यांत शिवाजीचा उल्लेख नाही. शिवाजीचे सर्वात जुने चरित्र सभासदाचे. तिथेही रामदासाचा उल्लेख नाही. ज्यांनी रामदासचरित्र जवळून पाहिले व रामदास-निधनसमयी जे प्रौढ होते, व ज्यांनी शिवाजी जवळून पाहिला, त्यांनी रामदास उल्लेखिलेला नाही. जिजाबाईच्या निधनसमयी रामदास तिथे होते, ही माहिती बखरीची आहे; आणि उत्तरकालीन बखरीची आहे. शिवाजीला समर्थांचा मंत्रोपदेश नाही. तो मंत्रोपदेश १६५३ साली गोपाळभट याचा आहे. स्वामींच्यामुळे आम्ही राज्यास अधिकारी झालो, असे शिवाजी सर्वांनाच म्हणतो. समर्थांना, कचेश्वरभटांना, बाबा याकूतला सुद्धा. शिवाजीच्या उद्योगाला आरंभ १६४५. त्याची मुद्रा असणारे नक्की पत्र १६४६. रामदासी पंथाची स्थापना १६४९. हा कालानुक्रम समजून घ्यावा. राजनिर्मितीची प्रेरणा समर्थांची नव्हे, हा ह्याचा अर्थ, दासबोध मी वाचलेला आहे. एम.ए.ला शिकविलेलाही आहे. त्यात राजकारण फारसे नाही. सगळा भक्तिमार्गच आहे. फक्त राजकारण हा शब्द आहे. त्या नावाचे समास आहेत. पण त्यांतही राजकारण नाही. रामदासी पंथ आदिलशाहीत स्थापिला गेला व चाफळ देवस्थानचे पहिले विश्वस्त शिवाजीचेशत्रू आहेत. याचा अर्थ १६४९ ला रामदासासमोर शिवाजी नव्हता, असा आहे; आणि ते स्वाभाविक आहे. कारण हा वेळपावेतो शिवाजीचा फारसा पराक्रम कुणाला दिसलेलाच नव्हता. पण एकनाथाप्रमाणे रामदासही हिंदूंच्या पुनरुज्जीवनाची स्वप्ने पाहत होता. हिंदुधर्माचा अभिमान म्हणून मुसलमानांचा राग त्यांच्या मनांत होताच. औरंगजेब- शिवाजी व रामदास- दोघेही मेल्यावर २७ वर्षे जिवंत होता. पण औरंग्या पापी बुडाल्याची स्वप्ने एकनाथानुसरण करीत रामदास आधीच पाहत होता. समोरचा पुरावा पाहून, अनुमान करायचे, तर रामदासाचे शिवाजीकडे उत्कटतेने लक्ष १६५९ नंतर गेले असावे. ‘तुमचे देशी वास्तव्य केले. परंतु वर्तमान नाही घेतले’ असा रामदासाचा दावा या अनुमानाला पोषक आहे. शिवाजीला साधुसंतांविषयी आदर व आत्मीयता होती. साधुसंत तृप्त करणे, धर्म बिनधोक करणे तो स्वत:चे कर्तव्यच समजत होता. हिंदू राज्य जन्मते आहे, हे पाहून रामदास स्वाभाविकच हर्षोत्फुल्ल झाला असावा. ‘शिवाजीचा विजय, हा माझा विजय’ व ‘शिवाजीवर संकट, हे माझे संकट' असे रामदासाला वाटले असल्यास आश्चर्य नाही. शिवाजीचे काही हेर रामदासी म्हणून हिंडत असणे अगर रामदासी मंडळींनी काही समजले, तर लगेच कळविणे असेही घडत असावे. पण हा इतिहास १६६० नंतरचा. प्रत्यक्ष राजकारणाशी रामदासांचा संबंध नव्हे. रामदास-शिवाजी घनिष्ठता १६७४ नंतरची. हा क्रम ध्यानी असावा.

शिवाजी महाराजांना भवानीने एक तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. एक होती तलवार. तिचे नाव भवानी तलवार. ती एकाकडून शिवाजीला मिळाली, हा आख्यायिकेचा सौम्य प्रकार. शिवाजीच्या तलवारीत भवानीने प्रवेश केला. हा दुसरा थोडा कडक प्रकार. भवानीने ‘राक्षससंहारक शस्त्र अशी जी स्वत:ची तलवार ती आशीर्वाद म्हणून शिवाजीला दिली’ हा पूर्ण कडक प्रकार, अशी आख्यायिकेची तीन रूपे आहेत. ह्या दैवी खड्ग मिळण्याचा धागा एकनाथात आहे. रामदासांच्या नावे प्रसिद्ध असणारा ‘आनंदवनभुवन’ हा शब्द एकनाथाचाच आहे. शिवाजीचे लहानपण पुराणकथा ऐकण्यात गेले, अशी एक समजूत आहे. हे पुराण एकनाथी ‘भावार्थ रामायण’ अशी कल्पना केली, तर शिवाजीला सर्व प्रकारची प्रेरणा मिळण्याचे ते एक हमखास ठिकाण आहे. वरील कल्पनेला काडीमात्र पुरावा नाही. पण ह्या कल्पिताला एक महत्त्व आहे. आपण म्हणतो, जिजाबाई शिवाजीला रामकृष्णाच्या कथा सांगी. त्या ऐवजी, दोघेही भावार्थ रामायण पुराणिकांकडून ऐकत, असे म्हटले, तर त्या ग्रंथाधारे सगळ्या शिवाजीच्या मनोधारणेची संगती लावता येते.
शिवाजी हा स्त्रियांच्या अब्रूबाबत फार दक्ष असे. तो स्वतः विलासी नव्हता. विलासीपणा त्याला आवडतही नसे. आपल्या राज्यात देवळे, स्त्रिया, गाई, ब्राह्मण यांना उपसर्ग पोचू नये, अशी त्याची ताकीद होती. शत्रूच्या बायकांना सन्मानपूर्वक वागविण्याची त्यांची प्रथा तर खाफीखान यानेही वर्णन केली आहे. त्यामुळे कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजीच्या प्रकृतिधर्मात बसते. ऐतिहासिक प्रकरण तर ते नव्हेच. शिवाजीचे चरित्र खन्या नाट्यप्रसंगांनी भरलेले आहे. संभाजी मोहितेकडून पुरंधर घेणे, जिंकण्यास अवघड म्हणून प्रसिद्ध असणारे जावळीचे खोरे तीन महिन्यांत घेणे, अफजूलखान, पन्हाळगडाहून पलायन, शाहिस्तेखान, सुरतेची लूट, आग्ध्याहून सुटका असे एकाहून एक अद्भुत पण सत्य प्रसंग तिथे आहेत. तिथे नाट्याला कमीच नाही. मग खोटी सुभेदाराची सून, हिरकणी बुरूज, स्वराज्याच्या सनदा झोळीत टाकणे यांची गरज काय? आणि हे घ्यायचे, तर भवानी अंगात येणे, समर्थांसाठी वाघिणीचे दूध आणणे, का नको? एका रामदासी बखरीत म्हटले आहे की, शिवाजीची आपणांवर निष्ठा किती, हे पाहण्यासाठी स्वामींनी एकदा राजाची पत्नीच शृंगारून पाठविण्यास सांगितले. राजेही असे स्वामिभक्त की, त्यांनी तात्काळ पत्नी शृंगारून पाठविली. समर्थांनी आशीर्वादपूर्वक राजपत्नीची परत पाठवणी केली व राजाच्या निष्ठेची प्रशंसा केली. ही कहाणी का नको? अशी आख्यायिका सांगणारे एकमूर्ख व त्या ग्रंथबद्ध करून ठेवणारे शतमूर्ख. ह्या दंतकथा दोन्ही महापुरुषांची बदनामीच करतात, इतकेही त्यांना कळले नाही!।
आख्यायिका, दंतकथांनी उभा केलेला महादेवाचा अवतार, भवानीचा वरदहस्त असणारा मातृभक्त, वैराग्यपरायण, धर्मनिष्ठ, गुरुनिष्ठ, दैववादी व भवानीच्या कौलाप्रमाणे राजकारण करणारा, बालमित्राच्या साहाय्याने शौर्य दाखवून राजा होणारा, भातुकलीचा शिवाजी रंगवायचा, की वास्तवाचे आकलन नीट करायचे, हा प्रश्न आहे. शिवाजीचे सारे आयुष्य लढण्यात व घोड्याच्या पाठीवर गेले, असे आपण म्हणतो. शेजवलकरांनी, पुराव्याने, शिवाजीची हयात मोजून, त्याचे गडावर किती दिवस गेले, हे दाखविले आहे. शिवाजी पटाईत घोडेस्वार होता, साहसी होता, यात वाद नाही. पण त्याचे नित्याचे वाहन कमी श्रमाचे पालखी, मेणा हे होते. नित्य तो घोड्यावर नसे. सात-अष्टमांश जीवन त्याने किल्ल्यावर घालविले. तपशीलवार योजना आखणे, त्या पार पाडून घेणे, आवश्यक तेथे स्वत: धोका पत्करून साहस करणे ही त्याची पद्धत. निष्कारणची दगदग, अनाठायी साहसीपणा हा त्याचा स्वभाव नव्हे.
शिवाजीच्या जीवनाचा क्रमही नीट समजून घ्यावा. दादोजी होते, तोवर शिवाजीचेपराक्रम म्हणजे, शिवाजीच्या नावे दादोजी व त्याचे सहकारी यांची योजना व पराक्रम. तसे तर कागदपत्रांत संभाजीच्या नेतृत्वाखाली १६६९-७० साली मराठी फौजांचे पराक्रम वर्णिले आहेत. त्याचे वय १२-१३. हे पराक्रम व युद्धनियोजन प्रतापराव गुजरांचे. १६७१ ते १६७४ संभाजीच्या मुलकी कारभाराचे स्तुतिस्तोत्र सर्वत्र आहे. ती स्तुती, खरी म्हणजे, जिजाबाईची. १६४८ साली लढाई झाली, तिचे श्रेय कावजी व सामराज यांचे. शिवाजीचा नजरेत भरण्याजोगा पहिला पराक्रम जावळीचा. त्या वेळी तो २६ वर्षांचा होता. पंधरा वर्षांचा शिवाजी भौगोलिक ज्ञान, सेनानियोजन, युद्धाची योजना आखतो, जावळीत | आपला माणूस म्हणून दौलतराव मोरेशी संबंध जोडतो, हे अमानवी आहे; व १६४८ ते १६५६ ही आठ वर्षे ज्या धीमेपणाने शिवाजीने काढली, त्याला विसंगत आहे. शिवाजीसारख्या अलौकिक पुरुषाला सुद्धा राज्याभिषेकाला ४४ वर्षांचे व्हावे लागले. कारण ज्यांच्या विरोधी शिवाजीची झुंज होती, ते सामान्य लोक नव्हते. प्रचंड सेना, कसलेले सेनानी, योजनाकुशल माहितगार व विरोधक कपटनीती, व्यावहारिक मुत्सद्देगिरी यांचा पूर्ण अर्क असा आलमगीर ही सामान्य माणसे नव्हेत. अफजूलखान, शाहिस्तेखान, मिझराजा जयसिंग, आलमगीर यांपैकी एकही शत्रू सामान्य नव्हता. ज्याच्यावर शिवाजीने मात केली, त्याचे कर्तृत्ववान व अजस्र व्यक्तिमत्त्व रंगवूनच शिवाजीचे मोठेपण वर्णन करता येते. सर्व देवांना बंदिवान करणारा रावण, महापराक्रमी कुंभकर्ण व इंद्रजित यांचा पराभव करण्यातच रामाचे मोठेपण असते. ढेकूण, मच्छर, उवा मारणे याला शिकार म्हणतच नाहीत. शिकार वाघ-सिंहांचीच. या दृष्टीने माधवरावापेक्षा शिवाजी रंगवणे अवघड. कारण इथे अनेक भव्य पुतळे उभे करावे लागणार आहेत. शिवाजीचे विरोधक रंगविण्यात अपयश आले, की अर्धा शिवाजी कोसळतो.
शिवाजीचा मोठेपणा व त्याच्या मर्यादा नीट समजून घेतल्या पाहिजेत. सतराव्या शतकातील युरोपच्या कोणत्याही राज्यकर्त्यामागे जसा युरोपचा रिनेसान्स आहे, तशी पार्श्वभूमी शिवाजीला नाही. वारकरी पंथाच्या हिंदुधर्माभिमानी उदारमतवादाची धार्मिक पार्श्वभूमी फक्त त्याला आहे. म्हणून क्रॉमवेल या आधीच्या व नेपोलियननंतरच्या माणसांपेक्षा शिवाजी निराळा आहे. त्याची मनोभूमिका इहलोकवादी नव्हे. लोकशाहीवादी नव्हे. तो समाजवादी नाही. बहुजन समाज सुशिक्षित व साक्षर करावा, वा आपण छापखाने काढावे ( शिवाजीने छापखाना काढण्याचा उद्योग केला होता, अशी एक समजूत मध्ये काही इतिहासकारांनी जोराने पुरस्कारलेली होती. ) स्त्री दास्य विमोचन करावे, जातिभेद मोडावे, अस्पृश्योद्धार करावा, बालविवाह मोडावे, विधवाविवाह पुरस्कारावे, असले विचार शिवाजीजवळ नव्हते, एखाद्याने असला पापी विचार मांडला असता, तर शिवाजीने त्याचेहातपाय मोडले असते. तो तोफा आणि दारूगोळा सदैव इंग्रजांकडून किंवा डचांकडून घेई. आपण दारूगोळा निर्माण करावा, याचा त्याने विचार केला नाही. हे युरोपियन आले कोठून? व का आले? याची फारशी माहिती शिवाजीला असणार नाही. त्याच्या जन्माआधी गॅलिलिओने आकाशात टेलिस्कोप लावला. कोलंबसने अमेरिका शोधली व मॅगेलिनने पहिली पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली, याची वार्ता छत्रपतींना नव्हती. जगातील सर्व थोर पुरुषांप्रमाणे शिवाजी आपल्या काळाचे अपत्य होता. या काळाच्या अंत:प्रवाहाचे आकलन त्याला किती झाले आणि आपल्या काळाच्या पुढे तो किती गेला, या कसोटीवर त्याचे मोठेपण ठरणार आहे.
पाच वर्षांपूर्वी ‘हिंदू’ या नियतकालिकात एक लेख आला होता. लेखक दाक्षिणात्य, अप्रसिद्ध म्हणून त्याचे नाव आठवत नाही आणि वर्षही आठवत नाही. पण त्या लेखातील मजकूर आठवतो. शिवाजीचा मोठेपणा समजून घेण्यासाठी इतका चांगला लेख पाहण्यात नाही. लेखाचे शीर्षक होते. 'How Small Shivaji Was ?" लेखक म्हणतो, ‘शिवाजी हे महाराष्ट्रीयांचे दैवत आहे. त्याला परमेश्वरापेक्षा मोठा ठरविताना महाराष्ट्रीयांना थोडाही संकोच वाटणार नाही. मानवजातीच्या पाच हजार वर्षात एवढा मोठा राज्यकर्ता झाला नाही, ही भूमिका महाराष्ट्रीयांना केवळ अल्पोक्तीची वाटते. या स्तुतिगीतात मी भागिदार होऊ इच्छीत नाही. म्हणून मी, हा माणूस किती मोठा होता, हे पाहण्याऐवजी, तो किती छोटा होता, हेच पाहू इच्छितो. या दृष्टीने पाहताना पहिली गोष्ट ध्यानात येते, ती म्हणजे, शिवाजीने एक राज्य निर्माण केले. सर्व भारतभर सगळी मिळून ज्ञात इतिहासातील घराणी ५०० तरी असतील. त्या सर्वांना निर्माते होते. त्यांपैकी एक शिवाजी. पण ज्यांनी राज्य निर्माण केले, त्यांना राजकीय गोंधळामुळे राज्य स्थापन करण्याची संधी मिळाली. नालायक राजाच्या सुभेदारांनी केंद्र सत्तेचा दुबळेपणा पाहून स्वतंत्र व्हावे आणि मध्यवर्ती सत्तेला काहीही करता येऊ नये, नालायक राजा सेनापतीने पदच्युत करावा आणि स्वतः राज्य निर्माण करावे, असाच सर्व संस्थापकांचा मार्ग असतो. शाही सेना, कारभार चालविणारा अधिकारी-वर्ग या मंडळींना आयताच तयार मिळतो. पण ज्याला शून्यातून सारे निर्माण करावे लागले, कोणत्याही राजसत्तेच्या हजारोच्या फौजा वापरण्यास मिळाल्या नाहीत, ज्याने राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करताच प्रबल शत्रूची चढाई झाली, शेजारच्या सत्ता उतारात नसून चढत्या वैभवात होत्या, विजापूर आणि गोवळकोंडा यांच्या भरवैभवाचा तो काळ. इकडे शिवाजी विजापूरचा प्रदेश कातरून आपले राज्य निर्माण करीत होता. त्याच्या १०-१५ वर्षे आधी विजापूरकरांनी अर्धी निजामशाही गिळंकृत केली आणि शिवाजीच्या काळात सगळा कर्नाटक जिंकीत आणला. मोंगल राज्य तर वैभवाच्याशिखरावर होते. आरंभापासून ज्याच्याजवळ कधीच शत्रूचा मैदानात पराभव करण्याचे बळ नव्हते, २० वर्षे जे मिळविले, ते १६६५ साली ज्याला चार महिन्यांत गमवावे लागले, तरी शेजारच्या वैभवात असणाच्या प्रबळ सत्तांशी झुंजून ज्याने २९ वर्षांच्या सतत परिश्रमाने राज्य निर्माण केले, असा शिवाजी आहे. भारताच्या राज्यसंस्थापकांत या मुद्द्यावर शिवाजीची तुलना कुणाशी करावी, हे समजले की, तो किती लहान आहे, हे सांगणे सोपे होऊन जाते.
‘हिंदूंच्या राज्याचे काही विशेष आहेत. शत्रूशी लढताना त्यांचे विजय होत नाहीत, असे नाही. विजय होतातच. पण यांचा विजय झाला, म्हणजे शत्रूचा मोड होत नाही. त्याचे राज्य कमी होत नाही. त्याचे सामर्थ्य कमी होत नाही. या विजयी राजाचे राज्य वाढत नाही. विजय मिळाला, तरी याचे सामर्थ्य खच्ची झालेले असते. ते भरून निघत नाही. म्हणून असे दिसते की, पराजयात समूळ नाश. विजयात थोडे सामर्थ्य खर्ची होऊन दुबळे होणे हा हिंदू राजांचा क्रम आहे. विजयाने राज्य वाढावे, सामर्थ्य वाढावे, पराजयात प्रदेश कमी झाला, तरी सामर्थ्य व जिद्द टिकावी, हा हिंदूचा नवा इतिहास शिवाजीपासून सुरू होतो. दुसरी गोष्ट अशी की, हिन्दू राजांना, शेजारी काय चालले आहे, याची वार्ताच नसे. शत्रूने सिद्धता करावी, आक्रमणाची वेळ साधावी, हे बेसावध असावेत, शत्रू ह्यांच्याच प्रदेशात शे-दोनशे मैल चालून यावा, मग हे जागे होणार! लढाई यांच्याच प्रदेशात, जयपराजय काहीही होवो. प्रदेश यांचाच बेचिराख होणार. हा हिंदूंचा इतिहास शिवाजीवर बदलतो. लढण्याआधी सावधपणा व शत्रू बेसावध असेल, तर त्याच्या मुलूखात जाळपोळ, लुटालूट हा नवा इतिहास इथून सुरू होतो. तिसरी बाब म्हणजे, हिन्दू राजांनी विश्वास ठेवावा, करार करावे, शत्रूनी दगे द्यावे, हा इतिहास बदलून, शिवाजीने दगे द्यावे व सर्वांनी थक्क व्हावे, असा इतिहास इथून दिसतो. हिंदूंच्या इतिहासात या मुद्द्यावर शिवाजीची तुलना कोणाशी करावी, हा शोध चालू आहे. अशी अजून एक-दोन माणसे सापडली की, हा किती लहान आहे, हे सांगणे सोपे होते.
‘शिवाजी धार्मिक होता; पण धर्मभोळा नव्हता. कठोर होता; पण क्रूर नव्हता. साहसी होता; पण आततायी नव्हता. व्यवहारी होता; पण ध्येयशून्य नव्हता. उच्च ध्येयाची स्वप्ने पाहणारा स्वप्नाळूही. ही स्वप्ने वास्तवात उतरविणारा कठोर वास्तववादी हे त्याचे स्वरूपआहे. तो साधा राहत नसे. डौलदार, वैभवसंपन्न अशी त्याची राहणी, पण तो डामडौलात उधळ्या नव्हता. परधर्मसहिष्णुता त्याजजवळ होती. याबाबतीत अशोक, विक्रमादित्य, हर्ष, अकबर यांच्याशी शिवाजीची तुलना करता येणे शक्य आहे. पण सर्वांना प्रचंड जनानखानेहोते. अकबराचा मीनाबाजार होता. अशोकाची तिष्यरक्षिता होती. शिवाजीने वासना मोकाट सोडलेली नव्हती, तरुण सुंदरी, रूपरत्ने, आस्वादासाठी गोळा करणारी सर्व हिंदू-मुस्लिम राजांची सत्तरीपर्यन्त टवटवीत राहणारी रसिकता शिवाजीजवळ नव्हती. चित्र, शिल्प, संगीत, काव्य यांना उदार आश्रय देणे, मोठमोठ्या इमारती बांधणे इतका पैसाही शिवाजीजवळ नव्हता. त्याला फुरसदही नव्हती. त्याच्या मनाचा तो कलच नव्हता. दुष्काळात लाख लोक अन्नान्न करीत मरत असताना, वेठबिगार आणि कोरडे यांच्या जोरावर वीस कोट रुपये खर्चेन ताजमहाल बांधणारी रसिकता अगर सगळा भारत क्रमाने इंग्रजांच्या आहारी जात आहे, ही गौण बाब समजून भारतभर देवळे, घाट, धर्मशाळा बांधण्याइतकी पण्यपावनता शिवाजीजवळ नव्हती. तो तमच्या-माझ्यासारखा ‘पापी व ‘उपयोगितावादी माणूस होता. रसिक अगर पुण्यवान नव्हता. खाफीखान म्हणतो, तो नरकात गेला. मलाही वाटते, तो नरकातच गेला असावा. राज्य शिल्लक ठेवण्यापेक्षा वीरमरण पत्करणारे वीरपुरुष, सेना वाढविण्यापेक्षा यज्ञ करण्यावर भर देणारे पुण्यपुरुष, यांच्या सहवासात त्याला करमलेच नसते, आणि हे सर्वजण स्वर्गात होते. अकबराने हिंदूंच्या बाबतीत उदार धोरण स्वीकारले. त्याची बरीच स्तुती करून झाली आहे. पण बहुसंख्य प्रजेला संतुष्ट ठेवल्याशिवाय स्थिर राजवटीचा पाया घालता येत नसतो, हे साधे व्यवहारज्ञान आहे. ज्यांचे शौर्य साम्राज्य निर्माण करण्याकरिता होते, ते बळकट करीत होते, जे बहुसंख्य होते, कर देऊन वैभव निर्माण करीत होते, त्यांना अकबराने औदार्याने वागविले आणि हिंदूंना आक्रमणाचा इतिहास नव्हता. त्यांनी मशिदींचे विध्वंस केले नव्हते. मुसलमानांच्या कत्तली केल्या नव्हत्या. त्यांच्या बायका भ्रष्टविल्या नव्हत्या. सक्तीचे धर्मांतर लादले नव्हते. ज्यांना आक्रमणाचा इतिहास नाही, ज्यांच्याकडून आक्रमण होण्याची भीती नाही, त्यांना अकबराने औदार्याने वागविले. शिवाजीच्या प्रजेत मुस्लिम बहुसंख्या नव्हती. ती त्याच्या कराचा आधार नव्हती. मुसलमानांच्या तलवारी ज्यांचे राज्य निर्माण करीत नव्हत्या, त्यांना आक्रमणाचा इतिहास होता. पुन्हा आक्रमणाची भीती होती. शेजारी आलमगीर पुन्हा जिझीया बसवीत होता. तरी शिवाजीने मुसलमानांना औदार्याने वागविले. भोवतालच्या मुस्लिम राज्यांच्या भीतीने नव्हे, तर स्वयंभू औदार्य म्हणून! ।
‘ह्या पार्श्वभूमीवर शिवाजी छोटा करून पाहण्याची माझी तयारी आहे. पण तो कुणापेक्षा छोटा ठरवावा? ते मोजमाप आहेच कुठे?'
वर दिलेला गोशवारा म्हणजे त्या लेखाचा अंदाजे सारांश. त्यात उदाहरणात कमीजास्त असण्याचा संभव आहे. मुद्दे-लेखकाचे, शैली माझी.

वरील लेखात दोन मुद्द्यांचा अनुल्लेख आहे. त्याचा उल्लेख केला, म्हणजे शिवाजीच्या मोठेपणाचे ठळक स्वरूपात पुराण संपले. पहिली गोष्ट म्हणजे, शिवाजी कुशल सेनानी, युद्धतज्ज्ञ होता. यात वाद नाही. पण याखेरीज तो मुलकी कारभाराचा तज्ज्ञ होता. जनतेच्या इहलौकिक कल्याणाची जबाबदारी राजाची आहे, असे त्याला वाटे. इतक्या लढाया तो लढला, पण त्यासाठी प्रजेवर नवे कर त्याने लादले नाहीत. राज्याभिषेकाचा खर्चही वतनदारांवर कर लावून त्याने काढला. जनतेवर कराचा बोजा वाढविला नाही. ‘मी शत्रूना दगा दिला. मित्रांना दगा दिल्याचे दाखवा' असे आव्हान त्याने एका पत्रात दिले आहे. या आव्हानाला उत्तर नाही. कौल देऊन गावे वसविणे, शेतसारा निश्चित करणे, किल्ल्यावर धान्यकोठारे भरून ठेवणे, शेतक-यांना बी-बियाणे, नांगर, बैल यांसाठी कर्जाची सोय करणे, भाषा सुधारण्यासाठी राज्य व्यवहारकोश, पंचाग सुधारण्यासाठी करणकौस्तुभ, धर्म सुधारण्यासाठी प्रायश्चित्त देऊन हिंदू करणे, नवे किल्ले बांधणे असा चौरस विधायक उद्योगही त्याने केला. तो नुसता सेनानी नव्हे.
दुसरी व माझ्या मते सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, शिवाजीने जे राज्य निर्माण केले, ते जपण्यासाठी २७ वर्षे जनता लढली. शिवाजी वारल्यावर संभाजीच्या नेतृत्वाखाली, तो मारला गेल्यावर १९ वर्षे, ज्याला जसे सुचेल, तसे सर्वजण लढत होते. या लढ्यात मोगलांची किमान पाच लाख माणसे मारली गेली असावीत, असा जदुनाथांचा अंदाज आहे. मराठ्यांची सुद्धा दोन-एक लाख माणसे मारली गेली असावीत; पण १७०७ साली भालेराई सुमारे दीडलाख होती. थोरले मोठे नेतृत्व नाही. पगार नियमित मिळण्याची सोय नाही. या २७ वर्षांत औरंगजेबाचा पराभव नाही. कारण ती शक्तीच मराठ्यांत नव्हती. (जदुनाथ म्हणतात, आलमगिराला विजयामागून विजय मिळाले. एकेका ठिकाणी, अनेकदा सर्व ठिकाणी तो विजयी झाला. या सर्व विजयांनंतर लाखो लोक मारून, कोट्यवधी रुपये खचून, अखिल भारतीय साम्राज्य खिळखिळे करून घेणे व स्वतः मरणे यापेक्षा पदरात काहीच पडले नाही. तो मराठ्यांचा पराभव करू शकला नाही) तरीही मराठे लढत राहिले. ज्या वेळी पेशवाई बुडाली, तेव्हा लोकांनी समाधानाचा नि:श्वास टाकला. चला, एकदाचे कायद्याचे राज्य आले. अंदाधुंदी संपली व शांतता आली. ही जनतेची प्रतिक्रिया होती. बक्सरच्या लढाईत इंग्रजांनी पूर्व बंगाल घेतला, तेव्हा हिंदूंनी सार्वत्रिक आनंदोत्सव केला. १५६५ नंतर जनता लढली असती, तर विजयनगर बुडालेच नसते. ११९८ नंतर जनता लढली असती, तर भारतावर मसलमान राज्य आलेच नसते. राणा प्रतापने मोगलांविरुद्ध चिवट लढा दिला, पण सेना लढत होती. जनता उदासीन होती. सोमनाथला वाचविण्यासाठी लाख लोक मेले, पण आजूबाजूचा प्रदेश शांत होता. पृथ्वीराज चव्हाण,
राणा प्रताप, रामराजा ही माणसे धार्मिक नव्हती, असे नव्हे. कट्टर धार्मिक होती. त्या वेळी मुसलमान अत्याचारी नव्हते, असे नव्हे. अधिक अत्याचारी होते. आम जनता धर्माभिमानी, धर्मप्रेमी नव्हती काय? असेही नव्हे. जनताही कट्टर धर्माभिमानी होती; पण ते राज्य वाचविण्यासाठी जनता लढली नाही. राज्य टिकविण्यासाठी जनता लढण्याचा उल्लेख, भारताच्या इतिहासात प्रथम कलिंगला मिळतो. नंतर चौथ्या शतकाशेवटी यौधेयाचा आहे. हे दोन उल्लेख नक्की. कदाचित टोळीवाले शिकंदरविरोधी लढले असतील. जिथे जनता लढते, तिथे फौजा निकामी होतात. १२०० वर्षांनंतर शिवाजीच्या राज्यासाठी जनता लढली. ही आत्मीयता कशी निर्माण झाली, याचे उत्तर धर्माभिमान हे नव्हे. आपण लढू शकतो, हा आत्मविश्वास निर्माण करणे, छापे घालण्याचे तंत्र निर्माण करणे व वीरतेच्या खोट्या कल्पनांच्या आहारी जाऊन लढून मरणे यापेक्षा टिकणे, पळणे, थकवणे, नाश करणे हे नवे मूल्य प्रस्थापित करणे हे एक उत्तर व प्रजेच्या इहलौकिक सोयी सांभाळणे हे दुसरे उत्तर. धर्माभिमान क्रमाने तिसरा.
शिवाजीने कौटिल्य वाचला होता काय? ऐतिहासिकदृष्ट्या ह्याचे उत्तर सरळ नाही असे आहे. पण अशी कल्पना जर केली की, त्याने कौटिल्य वाचला होता, तर कौटिल्याचा आदर्श राजा हे शिवाजीचे प्रयोजन आहे. कौटिल्य म्हणतो, प्रजेचे इहलौकिक व पारलौकिक कल्याण साधणे, हे राजाचे काम आहे. शांतता ठेवणे, परकीयआक्रमणापासून वाचविणे, ही कामे केली, की राजाचे कर्तव्य संपले नाही. दुष्काळ अधूनमधून येतात. नापिकीही होते. राजाने धान्यकोठारे सदैव भरून ठेवावीत. पिके येतात, तेव्हा राजाने धान्य विकत घ्यावे. या वेळी व्यापारी भाव पाडून जनतेचे नुकसान करतात. शेतक-यांच्या जवळील धान्य संपले, म्हणजे भाव वाढून जनतेचे नुकसान होते. राजाने या वेळी धान्य विक्रीस काढून जनतेचे रक्षण करावे. ह्यामुळे एकीकडे प्रजारक्षण होते. दुसरीकडे सरकारी कोठारांतील धान्य नवे राहते. धान्य म्हणजे रत्न नव्हे. ती कुजतात, म्हणून सदैव जुने धान्य विकणे, नवे खरेदी करणे, हे काम चालू ठेवावे. त्यामुळे भाव आटोक्यात राहतात व प्रजारक्षण होते. मापे, वजने नेहमी पारखावी. कारण तेथेही व्यापारी फसवतात. व्याज किती घ्यावे, यावर नियंत्रण असावे. सावकारीला परवाना व कर असावा. माणसे व पशू यांना औषध देण्याचे काम पुण्याचे तर खरे, पण राजावर श्रद्धा बसण्यास उपयोगी व जनहिताचे आहे. दुष्काळात प्रजेला अन्न पुरवून वाचविणे, त्यानंतर बी, बैल, नांगर परविणे व त्याचा खर्च हप्त्याने वसल करणे हे राजाचे काम आहे. चोरी पकडणे इतकेच राजाचे काम नाही. त्याने नुकसानभरपाई दिली पाहिजे. प्रत्येक धंद्यावर कर असावा. कर एकदाच घ्यावा. त्याचे प्रमाण कायम (कौटिल्याच्या मते उत्पन्नाचा १/४भाग) असावे व तो उत्पन्न कमी झाल्यास कमी व्हावा, सडका बांधणे, तळी दुरुस्त करणे, विहिरी पाडणे, कालवे खोदणे, नवेनवे कारखाने उद्योगधंदे उभारण्यास मदत देणे हे राजाचे काम आहे. शिक्षा कठोर असल्या, म्हणजे गुन्ह्याचे प्रमाण कमी होत नाही. प्रत्येकाचा गुन्हा लपणार नाही, शिक्षा चुकणार नाही, याची खात्री असली, म्हणजे गुन्हे कमी होतात. अशी प्रजेची सर्वांगीण काळजी घेणे हे राजाचे काम आहे. हे जर राजा करीत नसेल, तर कर नाकारणे, राजा हाकलून देणे, त्याचा वध करणे हा प्रजेला हक्क आहे. नव्हे, ते तिचे कर्तव्य आहे.
कौटिल्य म्हणतो, जर एकजण कारस्थान करू लागला, तर गुपचूप वध करावा. १० जण कट करू लागले, तर जाहीर फाशी द्यावी. १०० जण कट करू लागले, तर फाशी देऊन दहशत निर्माण करावी. अनुयायांना माफी देऊन दुवा घ्यावा व कारभार कोठे चुकला, याचा शोध घेऊन दुरुस्ती करावी. सुखासुखी प्रजा बंड करीत नसते. प्रजेत राजा अप्रिय असला, तर सेना त्याला वाचवीत नसते. सेनापती, सरदार कुणीतरी त्याचा वध करतो.
प्रजेचे सर्वांगीण कल्याण हे राजाचे कर्तव्य आहे. त्यासाठी लढावे, मरावे, पड खावी, स्पर्धा करावी, वेळ पाहून उचल करावी, भेद करावा, फितुरी करावी, घात करावे, वचने द्यावी, तोडावी, मारेकरी घालावे, विषप्रयोग करावा. प्रजेच्या हितासाठी हे सारे करणे राजाचे कर्तव्य आहे. जो कर्तव्य करतो, त्याची सर्व पापे प्रजा जो दुवा देते, त्याने धुतली जातात व प्रजेच्या पुण्याचा १/६ मिळून स्वर्ग मिळतो. राजाला खासगी प्रेम नसते. द्वेष नसतो. मान-अपमान नसतो. लोभ-वैर नसते. राजा हा बोकड आहे- ज्याने जिवंतपणी नाचून करमणूक करावी, दूध द्यावे, लोकर द्यावी, मरून मांस द्यावे, चमडे द्यावे, शिंग, हाडे, खूरही द्यावे. ज्यासाठी हे करायचे, तो धनगर, प्रजा आहे. हे कर्तव्य जो राजा करीत नाही, त्याचे पुण्य प्रजेत वाटले जाते व प्रजेच्या एकूण पापाचा १/६ मिळून तो नरकात जातो. राजदंड इतका जबाबदारीचा आहे. म्हणून लोभी, लंपटाच्या हाती तो पेलतच नाही. त्याला सावध संयमी राजा लागतो.
वैयक्तिक पुण्य व धर्माचरणाची राजाला अपेक्षा नाही. प्रजेचे धर्म, वित्त, जीवित यांचे रक्षण हे राजाचे काम. राजा चारचक्षू असतो. म्हणून इंद्राला सहस्राक्ष म्हणतात. हजार हेर हे त्यांचे हजार डोळे. हेरांनी तापसी, बैरागी, मुंडी या वेषात हिंडावे. हुजूर, दासी, न्हावी, तैलाभ्यंग करणारे ज्योतिषी, वेश्या, जुव्वारी हे चांगले हेर असतात. शत्रूच्या प्रदेशाती



प्रत्येक बाब राजाला कळली पाहिजे. म्हणजे सदैव सावध राहता येते. शत्रूची बिंगे माहीत असणे हे राजाचे आद्य काम, शौर्याने लढावे, मरावे, पण मागे परतू नये, हा सैनिकाचा धर्म. लढावे, राज्य वाढवावे, पड घ्यावी, राज्य वाचवावे, काय वाटेल ते करून प्रजेचे रक्षण करावे, हा राजाचा धर्म,
राजाने नेहमी मला भूत-वेताळ वश आहेत, देवी-देवता प्रसन्न आहेत, त्यांचे दृष्टांत होतात, अशी माहिती सर्वत्र पसरावी. हेरांकरवी या कथा स्वतः पाहिलेल्या गोष्टी म्हणून प्रतिपादन कराव्या. हेरांनी आणलेल्या बातम्या कर्णपिशाचाने सांगितल्या, देवांचा दृष्टान्त होऊन त्याने सांगितल्या, असे म्हणावे.(याचाअर्थ असा नाही कि राजा अंधश्रद्धेला बढावा देत होते ,ते फक्त प्रजेचा विश्वास कायम ठेवायचे )
आपण मूळ कौटिल्य एकदा नजरेखालून घालावे. वरील माहितीतून साकार होणारे स्वभावरेखाटन कलाकृतीत जिवंत कसे करावे, सारा ध्येयवाद व वास्तववाद, धार्मिकता व सावधपणा, सेनानीपणा व चौरसपणा, धूर्तता व उदारता, भव्यपणा व नाट्य, मानवीपणा, असामान्यत्व व मर्यादा स्वभावरेखाटनात याव्यात, हे महत्त्वाचे. हा प्रसंग व तो प्रसंग घेणे वा टाळणे गौण. भूतवास्तवाचे आकलन हे वाङ्मयीन सत्य. ते साकार करण्यासाठी आवश्यक ते काल्पनिक वापरण्याची कादंबरीला मुभा असते.
एवढे सविस्तर पत्र वाचणे कंटाळवाणे होणार, हे मला कळत होते. नाही, असे नाही. पण मराठीत ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात वास्तवाचे आकलन करण्याचा पहिला यशस्वी प्रयोग करणारे आपण. शिवाजीला मराठी ललित वाङ्मयात वास्तवाच्या आकलनाचा योग प्रथमच येत आहे. म्हणून सविस्तर लिहिणे भाग पडले. शिवाजी या व्यक्तिरेखेविषयी ममत्व हा भाग अर्थातच आहे. आपण म्हणता, ‘इतिहास, दंतकथा, आख्यायिका, इत्यादी सर्व मी वापरणार. मला ही विलक्षण व्यक्तिरेखा काल्पनिकाच्या पसाच्यात गमावली जाण्याची भीती वाटते. शिवाजीची व्यक्तिरेखा आपणांसमोर आहे.







No comments: